शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शहरांमधील मॅनहोलची झाकणे सुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:50 IST

मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून नुकताच एकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून नुकताच एकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोखंडी झाकणे चोरी होत असल्यामुळे केडीएमसीच्या हद्दीत मॅनहोलवर सिमेंट आणि फायबरची झाकणे लावण्यात आली आहेत. महापालिकेने ही झाकणे सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी फायबरची झाकणे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे निघू शकतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.पूर्वी मॅनहोलवर लोखंडी झाकणे असत. चोरटे या लोखंडी झाकणांची चोरी करत असल्यामुळे मॅनहोल उघडे पडण्याचे प्रमाण जास्त होते. त्यावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी सिमेंटची झाकणे लावण्याचा पर्याय स्वीकारला गेला. शहरातील प्रमुख रस्ते आता सिमेंट काँक्रिटीकरणाचे असल्याने मॅनहोलवरील झाकणेही सिमेंटची आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांची झाकणे ही फायबरची आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील मॅनहोलवरील काही झाकणे फायबरची आहेत. मात्र, ही झाकणे वाहनांची जास्त रहदारी असलेल्या रस्त्यावर फार काळ टिकाव धरत नाहीत. शहराप्रमाणे २७ गावांत सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्थाच अस्तित्वात नाही. त्यामुळे अनेक गावांत पावसाचे पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत.कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर झाकण उघडे होते. बेतूरकरपाड्यातील मॅनहोलचे झाकण शनिवारी बसवण्यात आले. कल्याण स्टेशन परिसरातील संतोष हॉटेल परिसरातून दीपक हॉटेलकडे जाणारी रहदारीच्या गल्लीतील ड्रेनेज लाइन ओव्हरफ्लो होत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दुरुस्ती करून जुन्या वाहिन्या तिथेच पडल्या आहेत. शिवाजी चौकातील गटारीचे झाकण तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी फोडले. ते पुन्हा पूर्ववत त्याठिकाणी बसविलेले नाही. महापालिका हद्दीत मॅनहोलमध्ये पडून मृत्यूची घटना घडलेली नसली तरी वर्षभरापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी दुरुस्त करण्यासाठी तीन कामगार उतरले होते. त्यांचा आतमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना महापालिका हद्दीत घडली नसून ती एमआयडीसीच्या हद्दीत होती.>महापालिकेचे दुर्लक्षशहरी भागांत पाऊस जास्त पडला की, सांडपाण्याच्या वाहिन्या तुडुंब भरून वाहतात. पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असला की, मॅनहोलची झाकणे निघून जातात. काही वेळा कचऱ्यामुळे पाणीवाहिन्या तुंबल्यास कामगार मॅनहोलचे झाकण काढून साफ करतात. पुन्हा त्याच पद्धतीने ते झाकण बसविले जात नाही. त्यामुळे मॅनहोल उघडेच राहतात. अनेकदा झाकणे तुटल्यावर ती बदलण्याची तसदी महापालिका घेत नाही.