शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. त्यावर तातडीने उपाययोजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. आपण लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

पाणीप्रश्नाबाबत चव्हाण यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण आणि ननावरे यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर चव्हाण यांनी देसाई यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत पाणीसमस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणीवितरण सुरळीत होईल, असे अधिकारी कसे सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी देसाई यांना केला.

मुबलक पाणी असताना २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे. महापालिका आणि एमआयडीसी यांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या, पण समस्या तत्काळ सोडवा, असे चव्हाण म्हणाले. माजी नगरसेविका आत्मदहनाचा इशारा देते, यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून, पाणी समस्या तत्काळ मार्गी लावा, असे ते म्हणाले.

‘१०० टँकरने पाणीपुरवठा करा’

२७ गावांमध्ये १०० टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा. सर्व ग्रामस्थांना पाणी मिळायला हवे. मराठवाडा, विदर्भ येथे टँकरने पाणीपुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथे का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

-------