शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. त्यावर तातडीने उपाययोजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. आपण लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

पाणीप्रश्नाबाबत चव्हाण यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण आणि ननावरे यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर चव्हाण यांनी देसाई यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत पाणीसमस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणीवितरण सुरळीत होईल, असे अधिकारी कसे सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी देसाई यांना केला.

मुबलक पाणी असताना २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे. महापालिका आणि एमआयडीसी यांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या, पण समस्या तत्काळ सोडवा, असे चव्हाण म्हणाले. माजी नगरसेविका आत्मदहनाचा इशारा देते, यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून, पाणी समस्या तत्काळ मार्गी लावा, असे ते म्हणाले.

‘१०० टँकरने पाणीपुरवठा करा’

२७ गावांमध्ये १०० टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा. सर्व ग्रामस्थांना पाणी मिळायला हवे. मराठवाडा, विदर्भ येथे टँकरने पाणीपुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथे का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

-------