शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांत पाणीटंचाई भेडसावत असून, लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. त्यावर तातडीने उपाययोजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. आपण लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

पाणीप्रश्नाबाबत चव्हाण यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण आणि ननावरे यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर चव्हाण यांनी देसाई यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत पाणीसमस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणीवितरण सुरळीत होईल, असे अधिकारी कसे सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी देसाई यांना केला.

मुबलक पाणी असताना २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे. महापालिका आणि एमआयडीसी यांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या, पण समस्या तत्काळ सोडवा, असे चव्हाण म्हणाले. माजी नगरसेविका आत्मदहनाचा इशारा देते, यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून, पाणी समस्या तत्काळ मार्गी लावा, असे ते म्हणाले.

‘१०० टँकरने पाणीपुरवठा करा’

२७ गावांमध्ये १०० टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा. सर्व ग्रामस्थांना पाणी मिळायला हवे. मराठवाडा, विदर्भ येथे टँकरने पाणीपुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथे का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

-------