शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 14, 2024 18:05 IST

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपण गद्य सुद्धा नीट बोलत नाही त्यामुळे पद्य सादरीकरणामध्ये आपल्याला अडचण येते. आपण सादरीकरण कराताना आपल्या उच्चाराकडे लक्ष नसेल तर ऐकणारा श्रोता देखील आपल्या संभाषणाकडे लक्ष देत नाही. वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

रविवारी गडकरी रंगायतन येथे टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य पे चर्चा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. हल्ली काय लिहीले यापेक्षा कोणी लिहीले याला जास्त दाद दिली जाते. नविन लिहिलेल लोकांना ऐकवायला पाहिजे हे सांगताना जोशी यांनी पुढच्या वर्षी वारी ही कविता सादर करुन चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पहिली कविता कशी सुचली याचा प्रवास उलगडताना जोशी म्हणाले की, छोट्या छोट्या गावांतून ज्यावेळी मुले शहरात येतात त्यावेळी मराठी भाषेचेच वर्गीकरण केले जाते त्यामुळे त्यांना संभाषणाची आणि अभिव्यक्तीची भिती वाटू लागते. त्यामुळे ही मुले कोमेजून जातात. असाच सामाजिक परिस्थीतीमुळे दबले गेल्यामुळे मी सेंटर स्पेस घेण्याचा प्रयत्न करत होतो. कविता सुचते कशी? या माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, कविता सुचते कशी याला खरंतर उत्तर नसते. कविता स्वयंभू येते. शून्यातून उगवणारी गोष्ट असते. जादूगार आणि कवीत एकच फरक असतो. जादूगाराला जादू करताना त्यातून काय बाहेर येणार आहे हे माहित असते पण कवीला कोणती कविता सुचेल हे माहीत नसते. जादूगाराची जादू बाहेर येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव असतात पण जेव्हा कवीकडून कविता तयार होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकांसारखेच भाव असतात. या जगात अखंड काव्य आहे, लिहीणारा वर बसलेला परमेश्वर आहे. त्याला लिहायचे होते म्हणून तो वेगवेगळ्या देहातून लिहीतोय असे उद्गार त्यांनी काढले.

टॅग्स :thaneठाणे