शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 14, 2024 18:05 IST

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपण गद्य सुद्धा नीट बोलत नाही त्यामुळे पद्य सादरीकरणामध्ये आपल्याला अडचण येते. आपण सादरीकरण कराताना आपल्या उच्चाराकडे लक्ष नसेल तर ऐकणारा श्रोता देखील आपल्या संभाषणाकडे लक्ष देत नाही. वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

रविवारी गडकरी रंगायतन येथे टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य पे चर्चा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. हल्ली काय लिहीले यापेक्षा कोणी लिहीले याला जास्त दाद दिली जाते. नविन लिहिलेल लोकांना ऐकवायला पाहिजे हे सांगताना जोशी यांनी पुढच्या वर्षी वारी ही कविता सादर करुन चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पहिली कविता कशी सुचली याचा प्रवास उलगडताना जोशी म्हणाले की, छोट्या छोट्या गावांतून ज्यावेळी मुले शहरात येतात त्यावेळी मराठी भाषेचेच वर्गीकरण केले जाते त्यामुळे त्यांना संभाषणाची आणि अभिव्यक्तीची भिती वाटू लागते. त्यामुळे ही मुले कोमेजून जातात. असाच सामाजिक परिस्थीतीमुळे दबले गेल्यामुळे मी सेंटर स्पेस घेण्याचा प्रयत्न करत होतो. कविता सुचते कशी? या माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, कविता सुचते कशी याला खरंतर उत्तर नसते. कविता स्वयंभू येते. शून्यातून उगवणारी गोष्ट असते. जादूगार आणि कवीत एकच फरक असतो. जादूगाराला जादू करताना त्यातून काय बाहेर येणार आहे हे माहित असते पण कवीला कोणती कविता सुचेल हे माहीत नसते. जादूगाराची जादू बाहेर येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव असतात पण जेव्हा कवीकडून कविता तयार होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकांसारखेच भाव असतात. या जगात अखंड काव्य आहे, लिहीणारा वर बसलेला परमेश्वर आहे. त्याला लिहायचे होते म्हणून तो वेगवेगळ्या देहातून लिहीतोय असे उद्गार त्यांनी काढले.

टॅग्स :thaneठाणे