शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘कल्याण-शीळ’वरील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल; आमदारांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:55 IST

डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर परिसरातून या परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत  आहेत. 

डाेंबिवली :  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संरक्षक उपाययोजना म्हणून लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत असल्याने कल्याण-शीळ महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. ते या कोंडीत तासन्तास अडकून पडत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. या समस्येची गंभीर दखल घेऊन नागरिकांना कोंडीतून सोडवावे, त्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. 

चव्हाण यांनी बुधवारी फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीबाबत चर्चा झाली. पलावा-शीळ या अवघ्या १२ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभरापेक्षा जास्त अवधी लागत आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर परिसरातून या परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत  आहेत. 

प्रवासाचे सात तास आणि कामावरचे आठ तास, असा सध्या त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कामावरच्या तणावापेक्षा प्रवासाचा तणाव जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने नागरिक त्याबाबतच्या तक्रारी सांगतात. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी तेथील गर्दीचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. 

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चाप लावा 

  •  वाहतूककोंडी फोडण्यासाठी चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच चाप लावावा. लेनची शिस्त न पाळता केवळ पुढे जाण्याच्या उद्देशाने अन्य वाहनांच्या मध्येच घुसणाऱ्या वाहनचालकांवर सक्त कारवाई करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
  •  कल्याण-शीळ रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण सध्या सुरू आहे. मात्र, हे काम संथ सुरू असल्याने त्याबाबत सबंधितांना कामे जलद करण्यासाठी सूचना देणे गरजेचे आहे. 
  •  आमदार म्हणून सर्व सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. मात्र, सामान्यांचा त्रास कमी झालाच पाहिजे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
टॅग्स :kalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी