शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

उल्हासनगरात कबरस्तानाचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Updated: April 24, 2017 23:58 IST

शहरात कबरस्तानला दोन भूखंड मिळूनही तांत्रिक कारणाने हस्तांतरण प्रक्रिया लांबली आहे. २० वर्षांपासून मुस्लिम समाज कबरस्तानची

उल्हासनगर : शहरात कबरस्तानला दोन भूखंड मिळूनही तांत्रिक कारणाने हस्तांतरण प्रक्रिया लांबली आहे. २० वर्षांपासून मुस्लिम समाज कबरस्तानची मागणी करीत असून दफनविधीसाठी त्यांना कल्याण अथवा अंबरनाथला जावे लागते. मात्र, तांत्रिक कारणाने हस्तांतरण आणि ताबा प्रक्रिया लटकल्याने मुस्लिम संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला.उल्हासनगरात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. मात्र, शहरात कबरस्तान नसल्याने त्यांना दफनविधीसाठी कल्याण अथवा अंबरनाथ येथे जावे लागते. यामुळे मुस्लिम समाज नाराज आहे. तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी समाजाने विविध आंदोलने केली. प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली. पण, कार्यवाही शून्य. अखेर, दफनविधी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ करण्याचा निर्णय मुस्लिमबांधवांनी घेतला. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशान्वये म्हारळ गावाजवळील २ एकरचा भूखंड यासाठी दिला. दुसरीकडे महासभेने कबरस्तानसाठी एकाच वेळी दोन भूखंड मान्य केले. महापालिकेच्या परवानगीनंतर म्हारळ गावाजवळील कबरस्तानच्या भूखंडावर दोन मृतदेहांचे दफनही झाले. मात्र, त्यानंतर कबरस्तानात मृतदेहाचे दफनविधी करण्यास न्यायालयाने मनाई केली. तसेच कॅम्प-५ येथील भूखंड खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात आहेत. या प्रकाराने मुस्लिम समाजाला आजही मृतदेह ९ ते १० किमी लांब असलेल्या कल्याण व अंबरनाथ येथे न्यावे लागत आहेत. मृतदेहाच्या होणार हेडसांडीमुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी असून दोनपैकी एकतरी भूखंड यासाठी ताब्यात देण्याची त्यांची मागणी आहे. न्यायालय व शासनाने कबरस्तानासाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने मुस्लिमबांधवामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. समाजसेवक अनिल सिन्हा व एकलाख शेख यांनी मुस्लिमबांधवाच्या हक्काच्या कबरस्तानसाठी उल्हासनगर ते दिल्लीदरम्यान पदयात्रा सुरू केली. रविवारी ते राजस्थानमधील अजमेरला पोहोचले आहेत. दिल्लीला गेल्यावर पंतप्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अर्थमंत्री यांना कबरस्तान त्वरित हस्तांतरण करण्याची मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)