शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

वीज समस्यांबाबत डोंबिवलीत शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:09 IST

डोंबिवलीकर जनतेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर धडकमोर्चा काढून वीज कंपनीविषयी खदखदत असलेल्या असंतोषाला शनिवारी वाट मोकळी करून दिली. 

डोंबिवली - भरमसाठ वीज बिल, फॉल्टी मीटर, कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा विविध तक्रारींची गंभीर दाखल घेऊन शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली डोंबिवलीकर जनतेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर धडकमोर्चा काढून वीज कंपनीविषयी खदखदत असलेल्या असंतोषाला शनिवारी वाट मोकळी करून दिली. 

यावेळी युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, सभागृहनेता राजेश मोरे, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, महिला शहर संघटक कविता गावंड, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेविका वैशाली दरेकर, सारिका चव्हाण, विभाग प्रमुख अमोल पाटील, उपशहर संघटक किरण मोंडकर आणि शिवसैनिक उपस्थित होते.   

वीज समस्यांबाबत असलेल्या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता यांना यावेळी देण्यात आले असून यावर तातडीने कारवाई न केल्यास शिव सैनिकांतर्फे शिवसेना पद्धतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शहर कायमस्वरूपी लोडशेडिंग मुक्त करावे तसेच, अचानकपणे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होऊन होणारे नुकसान थांबविणे, वीज बिल घरपोच योग्य वेळी न येणे, मोबाईलवर आलेले बिल दाखवून भरण्यात आलेले बिल स्वीकारणे, टोल फ्री वर केलेल्या तक्रारीची दखल घेणे अशा विविध तक्रारींचा पाढा यावेळी डोंबिवलीकरांनी यावेळी वाचला. 

रस्त्यांच्या बाजूला वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे डी.पी. आणि ट्रान्सफॉर्मर हटवण्यात यावेत, डोंबिवली एम.एस.ई.बी मध्ये रात्रीच्या वेळी पॅावर हाउसला फक्त एकच कर्मचारी असतो, त्याठिकाणी नियमानुसार २ कर्मचारी असावेत, डोंबिवलीमध्ये ३ फेज डी.बी जंक्शन आहेत, त्या डी.बी  मध्ये बहुतेक केबलचे लग जळलेल्या  स्थितीत आहेत तसेच, ३ फेज जंक्शनवर कव्हर नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याकडे यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. 

सेनेतील दोन गट उघडगुरुवारी भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरण ला निवेदन दिले, शुक्रवारी मनसेने कोळसा दिला, तसेच शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन दिले होते. त्यानंतर शहरात फारसे भारनियमन नाही. पण तरीही शनिवारी सेनेने हा मोर्चा का काढला? सेनेतील दोन गट यावरून स्पष्ट समोर आले. पक्षात एकवाक्यता नसल्याचे हे द्योतक असल्याची टीका मनसे शहरप्रमुख मनोज घरत यांनी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना