शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

भिवंडी महानगरपालिका ऑनलाइन महासभेत दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीचा मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 8:18 PM

भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील चौधरी यांनी या महासभेत उपस्थित केला.

नितीन पंडित  

भिवंडी - भिवंडी  महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने नव्या आठ सदस्यांची निवडी करीता विशेष महासभा ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या महासभेत पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेचा मुद्दा जास्त गाजला. भाजप नगरसेवक निलेश चौधरी यांनी शहरातील धोकादायक इमारतींमधील वास्तव्यास मनपा प्रशासनाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा दावा केला. मनपा अधिकारी फक्त नोटीस देतात मात्र इतर कारवाई व पुनर्वसनासाठी कोणतीही व्यवस्था करीत नसल्याने आज शहरात धोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत असून, भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील चौधरी यांनी या महासभेत उपस्थित केला.या इमारत दुर्घटनेत इमारत मालक जिलानी यांच्या वर मनपा प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनी आपली चूक झाकण्यासाठी केलेले षडयंत्र असून जिलानी हे स्वतः मुस्लिम धर्मगुरू असून ते 1990 पासून उत्तर प्रदेश येथे स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मनपा प्रशासनाने आपले हात झटकले आहेत, असा आरोप देखील भाजपाचे नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला आहे. जिलानी इमारतीस बांधकाम परवानगी मनपा अस्तित्वात येण्या आधी ग्रुप ग्रामपंचायत नारपोली कामतघर असताना 25 सप्टेंबर 1975 साली देण्यात आली असल्याची माहिती चौधरी यांनी दिली असून, 1977 रोजी या इमारतीस घरनंबर मिळाले. त्यावेळी घर नंबर 1046 असे होते, मनपा अस्तित्वात आल्यानंतर या इमारतीस 69 हे घर नंबर मिळाले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक झाल्यांनतर या इमारतींमधील 54 सदनिकाधारकांना मनपाने नोटीस दिल्या होत्या. मात्र दुर्घटनेनंतर फक्त धर्मगुरू असलेल्या जिलानी यांच्या एकट्यावर कारवाई करणे चुकीचे असून मनपा अधिकाऱ्यांनी पंचनामादेखील चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा आरोप नगरसेवक चौधरी यांनी महासभेत केला आहे. विशेष म्हणजे 2008 साली या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे असेसमेंट मनपा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचेही आता समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करून चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. नगरसेवक चौधरींच्या आरोपानंतर आता ही समिती नेमकी काय अहवाल देते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महासभेत कोणार्क विकास आघाडीतर्फे विलास पाटील, भारतीय काँग्रेस पक्षातर्फे अरुण राऊत, मोहम्मद हलीम अन्सारी,आरिफ मोहम्मद हनीफ खान, प्रशांत अशोक लाड, डॉ. जुबेर अन्सारी, शिवसेनेतर्फे संजय म्हात्रे आणि वंदना मनोज काटेकर अशा नवीन आठ सदस्यांची निवड या महासभेत करण्यात आली असून, पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस पाच, शिवसेना दोन आणि कोणार्क विकास आघाडी एक सदस्यांची वर्णी लागली आहे.