शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Thane: मोदींचा हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा, खासदार राजन विचारे यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 16:10 IST

Thane: ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली. मात्र त्यांच्या मतदारसंघात सुरू होणाऱ्या लोकार्पण निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असा प्रश्न उपस्थित करत केंद्र व राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची विकृती असल्याची खोचट टीका उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला 2024 मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल.असे म्हटले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे - ऐरोली दरम्यान उभारलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो आहे. अशा ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केल्याचे ही विचारे यांनी म्हटले आहे. तसेच दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी सातत्याने पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असाच प्रश्न उपस्थित होत आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम पत्रकात विशेष उपस्थितांची नावेकार्यक्रमाच्या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत निमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपिल पाटील, उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्या नावांचा समावेश होता.

टॅग्स :thaneठाणे