शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

निमंत्रणपत्रिकेने नव्याने बदलला रंग!

By admin | Updated: February 2, 2017 03:13 IST

आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली

ठाणे : आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेला श्रेय देण्यात आलेले नसल्याने नाराज झालेले महापौर राजेंद्र देवळेकर यांची समजूत काढण्यासाठी नवी निमंत्रणपत्रिका तयार करण्यात आली आहे. ती करताना त्यात आणखी अनेकांची नाराजी दूर करत तिचा रंगही अधिक गडद झाला आहे. निमंत्रणपत्रिका हाती पडल्यापासून तिच्यावरून अनेक वाद झाले. आयोजकांपासून निमंत्रितांपर्यंत, सहकार्य करणाऱ्यांपासून शहरातील मान्यवरांत समावेश होत असलेल्या अनेकांची धुसफूस वाढली. त्यामुळे पुन्हा निमंत्रणपत्रिका छापून सर्वांची नाराजी दूर होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मूळच्या निमंत्रणपत्रिकेचा आराखडा कोणी तयार केला, त्यांना राजशिष्टाचाराचे भान नव्हते का? या चुका आधीच दुरुस्त करता आल्या नसत्या का, यावर आयोजकांतील कोणीही आता बोलण्यास तयार नाही. नव्या निमंत्रणपत्रिकेत आगरी युथ फोरमच्या १९ सदस्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष सहकार्य म्हणून राजकीय नेते, पदाधिकारी यांच्या आधी असलेल्या १८ नावांत भर घालून ती ५६ वर नेण्यात आली आहे. त्यात आजी-माजी आमदार, पालिकेतील राजकीय नेते, विविध सभापती, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या भरगच्च राजकीय नेत्यांनी, पालिका पदाधिकाऱ्यांनी हस्ते-परहस्ते नेमके कोणते सहकार्य केले, त्याचा तपशील मात्र आयोजकांकडे उपलब्ध नाही.ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत रोज वेगवेगळी पत्रके निघत असली, तरी त्यातील उपस्थितांची नावेही चारने वाढवून त्यात सुधीर जोगळेकर, अनिल वाघाडकर, उदय कर्वे, माधव जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे. संमेलनाच्या उद््घाटन सोहळ्यात राजशिष्टाचारानुसार नावांचा क्रम बदलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, उद््घाटक विष्णू खरे यांची नावे सुरुवातीला घेण्यात आली आहेत. तसेच आधीच्या पत्रिकेत उद््घाटनाच्या सत्कारमूर्तींत समावेश असलेले नागपूर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा समावेश आता समारोपाच्या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींत करण्यात आला आहे.उद््घाटनाच्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या कवी संमेलनात सहभागी कवींची नावेही वाढली आहेत. शिवाय, पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचाही समावेश नव्याने करण्यात आला आहे. ‘युद्धस्य कथा...’ या शनिवारच्या संवादात मान्यवरांच्या पदांत दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी शन्नांच्या नावे असलेल्या मंडपात संध्याकाळी ५.३० वाजता जर्मनीतील इंजिनीअर दिनेश क्षीरसागर यांच्या मुलाखतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याच दिवशी डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात संध्याकाळी होणाऱ्या ‘नवे कवी, नवी कविता’ या कार्यक्रमातील समन्वयक स्पृहा जोशी यांचे नाव वगळण्यात आले आहे. कवी कट्टा या नावाने चालणाऱ्या काव्यहोत्रात आधी फक्त राजन लाखे समन्वयक होते. आता त्यात हेमंत राजाराम, सुप्रिया नायकर, डॉ. अनिल रत्नाकर, प्रशांत वैद्य यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)