शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

निमंत्रणपत्रिकेने नव्याने बदलला रंग!

By admin | Updated: February 2, 2017 03:13 IST

आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली

ठाणे : आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेला श्रेय देण्यात आलेले नसल्याने नाराज झालेले महापौर राजेंद्र देवळेकर यांची समजूत काढण्यासाठी नवी निमंत्रणपत्रिका तयार करण्यात आली आहे. ती करताना त्यात आणखी अनेकांची नाराजी दूर करत तिचा रंगही अधिक गडद झाला आहे. निमंत्रणपत्रिका हाती पडल्यापासून तिच्यावरून अनेक वाद झाले. आयोजकांपासून निमंत्रितांपर्यंत, सहकार्य करणाऱ्यांपासून शहरातील मान्यवरांत समावेश होत असलेल्या अनेकांची धुसफूस वाढली. त्यामुळे पुन्हा निमंत्रणपत्रिका छापून सर्वांची नाराजी दूर होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मूळच्या निमंत्रणपत्रिकेचा आराखडा कोणी तयार केला, त्यांना राजशिष्टाचाराचे भान नव्हते का? या चुका आधीच दुरुस्त करता आल्या नसत्या का, यावर आयोजकांतील कोणीही आता बोलण्यास तयार नाही. नव्या निमंत्रणपत्रिकेत आगरी युथ फोरमच्या १९ सदस्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष सहकार्य म्हणून राजकीय नेते, पदाधिकारी यांच्या आधी असलेल्या १८ नावांत भर घालून ती ५६ वर नेण्यात आली आहे. त्यात आजी-माजी आमदार, पालिकेतील राजकीय नेते, विविध सभापती, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या भरगच्च राजकीय नेत्यांनी, पालिका पदाधिकाऱ्यांनी हस्ते-परहस्ते नेमके कोणते सहकार्य केले, त्याचा तपशील मात्र आयोजकांकडे उपलब्ध नाही.ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत रोज वेगवेगळी पत्रके निघत असली, तरी त्यातील उपस्थितांची नावेही चारने वाढवून त्यात सुधीर जोगळेकर, अनिल वाघाडकर, उदय कर्वे, माधव जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे. संमेलनाच्या उद््घाटन सोहळ्यात राजशिष्टाचारानुसार नावांचा क्रम बदलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, उद््घाटक विष्णू खरे यांची नावे सुरुवातीला घेण्यात आली आहेत. तसेच आधीच्या पत्रिकेत उद््घाटनाच्या सत्कारमूर्तींत समावेश असलेले नागपूर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा समावेश आता समारोपाच्या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींत करण्यात आला आहे.उद््घाटनाच्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या कवी संमेलनात सहभागी कवींची नावेही वाढली आहेत. शिवाय, पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचाही समावेश नव्याने करण्यात आला आहे. ‘युद्धस्य कथा...’ या शनिवारच्या संवादात मान्यवरांच्या पदांत दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी शन्नांच्या नावे असलेल्या मंडपात संध्याकाळी ५.३० वाजता जर्मनीतील इंजिनीअर दिनेश क्षीरसागर यांच्या मुलाखतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याच दिवशी डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात संध्याकाळी होणाऱ्या ‘नवे कवी, नवी कविता’ या कार्यक्रमातील समन्वयक स्पृहा जोशी यांचे नाव वगळण्यात आले आहे. कवी कट्टा या नावाने चालणाऱ्या काव्यहोत्रात आधी फक्त राजन लाखे समन्वयक होते. आता त्यात हेमंत राजाराम, सुप्रिया नायकर, डॉ. अनिल रत्नाकर, प्रशांत वैद्य यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)