शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाला तरुणाचा खून, तरुणीच्या भावासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:56 IST

अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.

ठाणे : नळपाड्यातील धर्मवीरनगरात रविवारी सायंकाळी झालेला खून आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.धर्मवीरनगरातील कै. श्रीपत पाटील गार्डनला लागून असलेल्या मैदानामध्ये २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आढळला. मृताच्या खिशामध्ये पोलिसांना पॅनकार्ड आणि एका तरुणीचे छायाचित्र मिळाले. पॅनकार्डवरून त्याचे नाव वसीम रशीद फकीर खान असल्याचे समजले. मात्र, त्यावर पत्ता नसल्याने पोलिसांनी तरुणीच्या छायाचित्रावरून तपास सुरू केला. पोलिसांकडून चौकशी सुरू असताना ती धर्मवीरनगरचीच रहिवासी असल्याचे समजले. तिला विचारपूस केली असता मृतक भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याला दोन अपत्ये असल्यामुळे तिच्या दोन्ही भावांचा प्रेमसंबंधास विरोध होता. रविवारी दुपारी तिचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या दोन मित्रांनी विवियाना मॉलजवळून वसीमला आॅटोरिक्षामध्ये सोबत घेतले.धर्मवीरनगरकडे जाताना त्यांनी वसीमला समजावण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाद होऊन धर्मवीरनगरातील मैदानामध्ये आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. तिच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर चितळसर पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवून तीन आरोपींना अटक केली. तिचा भाऊ रतनलाल ऊर्फ सोनू राजनाथ यादव (२६), त्याचे दोन मित्र पोखरण रोड क्रमांक २ वरील अरशद अबुलहसन खान (२१) आणि बाळकुम येथील विवेक सिकंदर यादव (२३) ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिचा दुसरा भाऊदेखील या प्रकरणात आरोपी असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.