शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

नवीन ठाण्याला स्थानिकांचा प्रखर विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:53 IST

ठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत

- अजित मांडके, ठाणेठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. तूर्तास दळणवळणाची कोणतीही सुविधा येथे नसल्याने खाडीवरील प्रस्तावित पूल हा या परिसराचे भविष्य बदलवू शकेल. असे असले तरी, येथील नागरिकांचा नव्या ठाण्याला ठाम विरोध आहे. नवीन ठाण्याची संकल्पना उत्तम असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना यंत्रणेला करावा लागणार आहे.महापालिका आणि एमएमआरडीएमार्फत नवीन ठाणे कसे असेल याची दमदार संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्यक्षात येथील रहिवाशांना ही संकल्पना कितपत पचनी पडणार आहे, याचा अभ्यास ठाणे पालिकेसह एमएमआरडीएलाही करावा लागणार आहे. मोकळ्या जमीनींवर मोठमोठे विकासाचे इमले बांधण्याचा घाट या यंत्रणांकडून घातला जात असला, तरी येथील रहिवाशी मात्र या नव्या संकल्पनेच्या विरोधात एकवटू लागले आहेत.येथील खारबाव गावाची लोकसंख्या ही १० हजारांच्या आसपास असून इतर आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या ही साधारणत: दीड ते अडीच हजारांच्या घरात आहे. परंतु येथील सर्वच रहिवासी नवीन ठाण्याच्या विरोधात एकवटले असून, याविरोधात आता गावागावात मिटींग होऊ लागल्या आहेत. नवीन ठाणे विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी रहिवाशांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विकास कोणीही थोपवू शकत नाही. परंतु हा विकास करताना आमचे गावठाण क्षेत्र, शांतता, जमिनी, शेती, ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैली हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळेच या नव्या ठाण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.गावपण हिरावले जाणार?सध्या येथील प्रत्येक गावाने आपली ओळख टिकविली आहे. त्यांनी आपले गावपन टिकविले आहे. परंतु नवीन ठाण्याचा विकास झाल्यास येथील सर्वच गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. मोठमोठे इमले येथे उभारले जाणार आहेत. त्यामुळे समृध्दीने नटलेल्या या गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. येथील गावकऱ्यांना याची चिंता मोठ्या प्रमाणात सतावत आहे.टॅक्स वाढणारसध्या येथील प्रत्येक घरासाठी वार्षिक ५०० ते १ हजारापर्यंत घरपट्टी आहे. नवीन ठाणे म्हणून येथील गावे विकसित झाल्यानंतर घरपट्टी वाढणार आहे. त्याचा भुर्दंड गावकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.रेल्वे ट्रॅकपासून आर झोन, रस्त्याच्या पलीकडे ग्रीन झोनरेल्वे ट्रॅकपासून वसई - भिवंडी हायवेपर्यंत आर झोन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाची संधी ही याच भागात असणार आहे. रस्त्याच्या पलिकडे मात्र ग्रीन झोन घोषीत करण्यात आला आहे. याच ठिकाणी फॉरेस्ट झोनसुध्दा आहे. त्यामुळे येथे विकासाला फारशी चालना मिळणार नाही. परंतु याच ठिकाणी पार्क, विरंगुळा केंद्र, उद्यान उभारण्यासाठी शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे