शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नवीन ठाण्याला स्थानिकांचा प्रखर विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:53 IST

ठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत

- अजित मांडके, ठाणेठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. तूर्तास दळणवळणाची कोणतीही सुविधा येथे नसल्याने खाडीवरील प्रस्तावित पूल हा या परिसराचे भविष्य बदलवू शकेल. असे असले तरी, येथील नागरिकांचा नव्या ठाण्याला ठाम विरोध आहे. नवीन ठाण्याची संकल्पना उत्तम असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना यंत्रणेला करावा लागणार आहे.महापालिका आणि एमएमआरडीएमार्फत नवीन ठाणे कसे असेल याची दमदार संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्यक्षात येथील रहिवाशांना ही संकल्पना कितपत पचनी पडणार आहे, याचा अभ्यास ठाणे पालिकेसह एमएमआरडीएलाही करावा लागणार आहे. मोकळ्या जमीनींवर मोठमोठे विकासाचे इमले बांधण्याचा घाट या यंत्रणांकडून घातला जात असला, तरी येथील रहिवाशी मात्र या नव्या संकल्पनेच्या विरोधात एकवटू लागले आहेत.येथील खारबाव गावाची लोकसंख्या ही १० हजारांच्या आसपास असून इतर आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या ही साधारणत: दीड ते अडीच हजारांच्या घरात आहे. परंतु येथील सर्वच रहिवासी नवीन ठाण्याच्या विरोधात एकवटले असून, याविरोधात आता गावागावात मिटींग होऊ लागल्या आहेत. नवीन ठाणे विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी रहिवाशांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विकास कोणीही थोपवू शकत नाही. परंतु हा विकास करताना आमचे गावठाण क्षेत्र, शांतता, जमिनी, शेती, ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैली हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळेच या नव्या ठाण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.गावपण हिरावले जाणार?सध्या येथील प्रत्येक गावाने आपली ओळख टिकविली आहे. त्यांनी आपले गावपन टिकविले आहे. परंतु नवीन ठाण्याचा विकास झाल्यास येथील सर्वच गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. मोठमोठे इमले येथे उभारले जाणार आहेत. त्यामुळे समृध्दीने नटलेल्या या गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. येथील गावकऱ्यांना याची चिंता मोठ्या प्रमाणात सतावत आहे.टॅक्स वाढणारसध्या येथील प्रत्येक घरासाठी वार्षिक ५०० ते १ हजारापर्यंत घरपट्टी आहे. नवीन ठाणे म्हणून येथील गावे विकसित झाल्यानंतर घरपट्टी वाढणार आहे. त्याचा भुर्दंड गावकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.रेल्वे ट्रॅकपासून आर झोन, रस्त्याच्या पलीकडे ग्रीन झोनरेल्वे ट्रॅकपासून वसई - भिवंडी हायवेपर्यंत आर झोन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाची संधी ही याच भागात असणार आहे. रस्त्याच्या पलिकडे मात्र ग्रीन झोन घोषीत करण्यात आला आहे. याच ठिकाणी फॉरेस्ट झोनसुध्दा आहे. त्यामुळे येथे विकासाला फारशी चालना मिळणार नाही. परंतु याच ठिकाणी पार्क, विरंगुळा केंद्र, उद्यान उभारण्यासाठी शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे