शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:39 IST

दिव्याचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे.

ठाणे : दिव्याचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, दिव्यातील डायघरसह खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांचा या माध्यमातून विकास केला जाणार आहे. यामध्ये रस्ते, दिवाबत्ती, पाणी, उद्यान, खेळाचे मैदान विकसित करणे, दवाखाने, रुग्णालयांसह शाळा बांधण्यात येणार आहेत. याशिवाय, इतर मूलभूत सोयीसुविधांचा समावेश आहे. यासाठी १४ कोटी ९२ लाखांचा खर्च अपेक्षित धरला असून यासंदर्भातील प्रस्ताव महासभेने नुकताच मंजूर केला आहे.ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीअंतर्गत बहुतांश भाग हा ग्रामीण आहे. या भागाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन येथील विकास करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार, या भागातील गावांचा विकास करण्यासाठी पालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार असताना सद्य:स्थितीत ताब्यात असलेले मोकळे आरक्षण, सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या सुविधा या बाबींचा विचार केला आहे.>असा होणार विकासनव्याने प्रभाग कार्यालय बांधण्यासाठी ७६ लाख ११ हजार, उद्यान विकास स्थापत्य कामांसाठी एक कोटी दोन लाख ३० हजार, खेळांसाठी आरक्षित असलेली मैदाने विकसित करण्यासाठी एक कोटी ३३ लाख ९५ हजार, दवाखाने बांधण्यासाठी एक कोटी ५० लाख, शाळांसाठी एक कोटी ७६ लाख ५० हजार, समाजमंदिर बांधण्यासाठी ५४ लाख, स्मशानभूमी बांधणे व नूतनीकरणासाठी एक कोटी १३ लाख ७५ हजार, रस्ते रुंदीकरण व नूतनीकरणासाठी दोन कोटी ९६ लाख, रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी एक कोटी, इमारती विद्युतीकरणासाठी ४५ लाख आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी दोन कोटी ४५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यानुसार, एकूण १४ कोटी ९२ लाख ६१ हजारांचा खर्च केला जाणार आहे.