शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाऐवजी यंदा हाती पेंढाच

By admin | Updated: November 30, 2015 02:11 IST

जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले

मोखाडा : जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले व खळ्यावर आणून ठेवलेले पीक पूर्णपणे भिजले आहे. त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने बुरशी येऊन पिकांचे दाणे काळे पडत आहे. त्यामुळे ते वाया जाण्याची भीती आहे. यामुळे आता धान्याऐवजी शेतकऱ्यांच्या हाती गवताचा पेंढाच राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जव्हार तसेच मोखाडा भागात खरीप हंगामात भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद यासारखी पिके घेतली जातात व यंदा या पिकांचे उत्पादनही चांगले आले होते. त्याचप्रमाणे याच पिकावर शेतकरी आपल्या कुटुंबाची वर्षभराची गुजराण करत असतो, त्यामुळे काही पिकांची विक्र ी करून उर्वरित पीक हे स्वत:च्या वापरासाठी ठेवले जाते. मात्र, सद्य:स्थितीत कापणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने घात केला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा हाताश झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने आदिवासींची सोसायटी व खावटी कर्जे माफ करावीत.- बाबुराव दिघा, चेअरमन, आदिवासी विविध कार्य सहकारी सोसायटी, मोखाडा