शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

तांदळाऐवजी यंदा हाती पेंढाच

By admin | Updated: November 30, 2015 02:11 IST

जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले

मोखाडा : जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले व खळ्यावर आणून ठेवलेले पीक पूर्णपणे भिजले आहे. त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने बुरशी येऊन पिकांचे दाणे काळे पडत आहे. त्यामुळे ते वाया जाण्याची भीती आहे. यामुळे आता धान्याऐवजी शेतकऱ्यांच्या हाती गवताचा पेंढाच राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जव्हार तसेच मोखाडा भागात खरीप हंगामात भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद यासारखी पिके घेतली जातात व यंदा या पिकांचे उत्पादनही चांगले आले होते. त्याचप्रमाणे याच पिकावर शेतकरी आपल्या कुटुंबाची वर्षभराची गुजराण करत असतो, त्यामुळे काही पिकांची विक्र ी करून उर्वरित पीक हे स्वत:च्या वापरासाठी ठेवले जाते. मात्र, सद्य:स्थितीत कापणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने घात केला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा हाताश झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने आदिवासींची सोसायटी व खावटी कर्जे माफ करावीत.- बाबुराव दिघा, चेअरमन, आदिवासी विविध कार्य सहकारी सोसायटी, मोखाडा