शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

तांदळाऐवजी यंदा हाती पेंढाच

By admin | Updated: November 30, 2015 02:11 IST

जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले

मोखाडा : जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले व खळ्यावर आणून ठेवलेले पीक पूर्णपणे भिजले आहे. त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने बुरशी येऊन पिकांचे दाणे काळे पडत आहे. त्यामुळे ते वाया जाण्याची भीती आहे. यामुळे आता धान्याऐवजी शेतकऱ्यांच्या हाती गवताचा पेंढाच राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जव्हार तसेच मोखाडा भागात खरीप हंगामात भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद यासारखी पिके घेतली जातात व यंदा या पिकांचे उत्पादनही चांगले आले होते. त्याचप्रमाणे याच पिकावर शेतकरी आपल्या कुटुंबाची वर्षभराची गुजराण करत असतो, त्यामुळे काही पिकांची विक्र ी करून उर्वरित पीक हे स्वत:च्या वापरासाठी ठेवले जाते. मात्र, सद्य:स्थितीत कापणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने घात केला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा हाताश झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने आदिवासींची सोसायटी व खावटी कर्जे माफ करावीत.- बाबुराव दिघा, चेअरमन, आदिवासी विविध कार्य सहकारी सोसायटी, मोखाडा