शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भिवंडी-वाडा रस्त्याची आमदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

भिवंडी : भिवंडी-वाडा-मनोर या ६२ किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ...

भिवंडी : भिवंडी-वाडा-मनोर या ६२ किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी रविवारी या रस्त्याची पाहणी केली. तसेच, या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची रस्त्यावरच झाडाझडती घेत रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे बजावले.

बीओटीच्या माध्यमातून विकसित केलेल्या या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती याेग्यरीत्या न केल्याने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ताब्यातून काढून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला आहे. नदीनाका ते अंबाडी हा भाग भिवंडी व पुढील रस्ता वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येताे. पहिल्या पावसातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघातही हाेत आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी ते वाडा या रस्त्याची पाहणी केली. यावेळी स्थानिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर हे खड्डे मुरूम मातीने न बुजविता पावसात चिखल होऊन रस्ता निसरडा होणार असल्याने ते काम तत्काळ थांबवून येत्या आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. या रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.

काेट

नदीनाका ते अंबाडी या भिवंडी विभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे हे तेथील ग्रीडने समतल केले जात आहेत. विशेष बाब म्हणून डांबर प्लांट सुरू करून या रस्त्यावरील खड्डे लवकर भरले जातील.

- सचिन धात्रक, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग