शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

खारी अंबिवलीकरांच्या बोटाला १४ वर्षांनंतर शाई

By admin | Updated: November 2, 2015 01:57 IST

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली.

उमेश जाधव, टिटवाळाकल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली. टिटवाळा पोलीस ठाण्यातून चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘अ’ प्रभाग क्षेत्रात एकूण ७ ते १५ या १० प्रभात ७० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ९१ हजार मतदान असणाऱ्या या ‘अ’ प्रभागात सकाळी अगदी शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लागल्या होत्या. तरूण- तरूणी, महिला- पुरूष व ज्येष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आनंदाने कुणाच्याही दडपणा खाली न येता बजावला. टिटवाळा जवळील खारी आंबिवली आणि मोहीली या दोन गावांतील नागरिकांनी तब्बल १४ वर्षांनी प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले. आपल्या गावात नागरी सुविधा मिळत नसल्याने १९८३ सालापासून या गावांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. मात्र या वर्षी महापालिकेतून वगळण्यात आलेली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्याने आपल्या गावांचा विकास होईल, या आशेमुळे त्यांनी या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावातील नागरिकामध्ये मतदानाचा हक्क बजावताना प्रचंड उत्साह दिसत होता. आम्हाला जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की, प्रशासनाकडून आपणास मुलभूत सेवासुविधा पुरविण्यात येतील. यामुळे आम्ही यावेळी मतदान करण्यासाठी तयार झालो आहोत. असे मत सुरेश पाटील (संघर्ष समिती ) यांनी व्यक्त केले.