शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खारी अंबिवलीकरांच्या बोटाला १४ वर्षांनंतर शाई

By admin | Updated: November 2, 2015 01:57 IST

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली.

उमेश जाधव, टिटवाळाकल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली. टिटवाळा पोलीस ठाण्यातून चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘अ’ प्रभाग क्षेत्रात एकूण ७ ते १५ या १० प्रभात ७० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ९१ हजार मतदान असणाऱ्या या ‘अ’ प्रभागात सकाळी अगदी शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लागल्या होत्या. तरूण- तरूणी, महिला- पुरूष व ज्येष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आनंदाने कुणाच्याही दडपणा खाली न येता बजावला. टिटवाळा जवळील खारी आंबिवली आणि मोहीली या दोन गावांतील नागरिकांनी तब्बल १४ वर्षांनी प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले. आपल्या गावात नागरी सुविधा मिळत नसल्याने १९८३ सालापासून या गावांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. मात्र या वर्षी महापालिकेतून वगळण्यात आलेली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्याने आपल्या गावांचा विकास होईल, या आशेमुळे त्यांनी या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावातील नागरिकामध्ये मतदानाचा हक्क बजावताना प्रचंड उत्साह दिसत होता. आम्हाला जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की, प्रशासनाकडून आपणास मुलभूत सेवासुविधा पुरविण्यात येतील. यामुळे आम्ही यावेळी मतदान करण्यासाठी तयार झालो आहोत. असे मत सुरेश पाटील (संघर्ष समिती ) यांनी व्यक्त केले.