शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लोहमार्ग पोलिसांना हवी खबऱ्याची माहिती, रेल्वे प्रशासनाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:39 IST

रस्ता अपघात असो किंवा एखादी घटना असो त्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लागतात.

- पंकज रोडेकर ठाणे : रस्ता अपघात असो किंवा एखादी घटना असो त्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लागतात. त्यामुळे शक्यतो नागरिक पोलिसांपासून दोन हात लांब राहतात. त्यातच, आता रेल्वे अपघाताची प्रथम खबर देणाºयांची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. तसेच प्रथम खबर देणाºयाची माहिती घेण्यापेक्षा जखमीला तत्काळ उपचार कसे मिळतील ही बाब महत्त्वाची आहे. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुमचा एक कर्मचारी रेल्वेच्या उपप्रबंधक कार्यालयात बसवा, उत्तर पोलिसांना दिले असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत ठाणे,कळवा, मुंब्रा, दिवा ही मध्य रेल्वे आणि ऐरोली हे ट्रान्स हार्बर या मार्गावरील महत्तवाची स्थानके आहेत. दिवसेंदिवस या स्थानकांतून प्रवास करणाºयांची संख्या वाढत आहे. त्यातच, या वाढत्या गर्दीतून प्रवासादरम्यान पडून किंवा रेल्वे क्रॉसिंग करताना, रेल्वे अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.अशा अपघातांची माहिती एखादा रेल्वे प्रवासी रेल्वे प्रबंधक कार्यालयात किंवा रेल्वे कंट्रोल रूमला देतो. त्या माहितीच्या आधारे रेल्वे प्रबंधक कार्यालयातील कर्मचारी, हमाल तातडीने घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर, त्या अपघाताबाबत रेल्वेकडून ठाणे लोहमार्ग पोलिसांना लेखी मेमोद्वारे माहिती दिली जाते. त्यानुसार रेल्वे अपघातांची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होते.हा प्रकार नित्यनियमाने कित्येत वर्षे सुरू असताना आता अचानक काही दिवसांपूर्वी ठाणेलोहमार्ग पोलिसांनी एक पत्रक काढून ते रेल्वे प्रबंधक कार्यालयाला धाडले आहे. त्यामध्ये जो कोणी रेल्वे अपघातातील जखमी किंवामयतची प्रथम खबर देतो किंवा ज्या कोणी जखमी किंवा मयत यांना पाहतो, त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर अशी माहिती द्यावी अशी माहिती मागितली आहे.>रेल्वे प्रवासात झालेल्या अपघाताची तातडीने माहिती देणाºयाचे स्वागत करण्याऐवजी अशाप्रकारे माहिती घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्या व्यक्तीच्या माणुसकीचा विचार करावा, तसेच अशाप्रकारच्या गोष्टींना प्रवासी संघटनेचा कायमस्वरूपी विरोध राहील. तसेच असे केल्यास कोणीही रेल्वे अपघाताची माहिती देणार नाही.’’- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.