शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लोहमार्ग पोलिसांना हवी खबऱ्याची माहिती, रेल्वे प्रशासनाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:39 IST

रस्ता अपघात असो किंवा एखादी घटना असो त्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लागतात.

- पंकज रोडेकर ठाणे : रस्ता अपघात असो किंवा एखादी घटना असो त्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लागतात. त्यामुळे शक्यतो नागरिक पोलिसांपासून दोन हात लांब राहतात. त्यातच, आता रेल्वे अपघाताची प्रथम खबर देणाºयांची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. तसेच प्रथम खबर देणाºयाची माहिती घेण्यापेक्षा जखमीला तत्काळ उपचार कसे मिळतील ही बाब महत्त्वाची आहे. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुमचा एक कर्मचारी रेल्वेच्या उपप्रबंधक कार्यालयात बसवा, उत्तर पोलिसांना दिले असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत ठाणे,कळवा, मुंब्रा, दिवा ही मध्य रेल्वे आणि ऐरोली हे ट्रान्स हार्बर या मार्गावरील महत्तवाची स्थानके आहेत. दिवसेंदिवस या स्थानकांतून प्रवास करणाºयांची संख्या वाढत आहे. त्यातच, या वाढत्या गर्दीतून प्रवासादरम्यान पडून किंवा रेल्वे क्रॉसिंग करताना, रेल्वे अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.अशा अपघातांची माहिती एखादा रेल्वे प्रवासी रेल्वे प्रबंधक कार्यालयात किंवा रेल्वे कंट्रोल रूमला देतो. त्या माहितीच्या आधारे रेल्वे प्रबंधक कार्यालयातील कर्मचारी, हमाल तातडीने घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर, त्या अपघाताबाबत रेल्वेकडून ठाणे लोहमार्ग पोलिसांना लेखी मेमोद्वारे माहिती दिली जाते. त्यानुसार रेल्वे अपघातांची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होते.हा प्रकार नित्यनियमाने कित्येत वर्षे सुरू असताना आता अचानक काही दिवसांपूर्वी ठाणेलोहमार्ग पोलिसांनी एक पत्रक काढून ते रेल्वे प्रबंधक कार्यालयाला धाडले आहे. त्यामध्ये जो कोणी रेल्वे अपघातातील जखमी किंवामयतची प्रथम खबर देतो किंवा ज्या कोणी जखमी किंवा मयत यांना पाहतो, त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर अशी माहिती द्यावी अशी माहिती मागितली आहे.>रेल्वे प्रवासात झालेल्या अपघाताची तातडीने माहिती देणाºयाचे स्वागत करण्याऐवजी अशाप्रकारे माहिती घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्या व्यक्तीच्या माणुसकीचा विचार करावा, तसेच अशाप्रकारच्या गोष्टींना प्रवासी संघटनेचा कायमस्वरूपी विरोध राहील. तसेच असे केल्यास कोणीही रेल्वे अपघाताची माहिती देणार नाही.’’- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.