शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात साहित्य निर्मितीवर जातीयवादाचा प्रभाव; पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:44 IST

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जातीयवाद ही फार मोठी समस्या लेखकांमध्ये जाणवत आहे. जातीयवादाचा वाईट प्रभाव साहित्य निर्मितीवर होऊ लागला आहे. राजकीय सोयीकरिता प्रसारमाध्यमे आणि साहित्यिकांकडून वस्तुस्थिती दुर्लक्षिली जाते. आताचे लेखक हे विशिष्ट विचारधारेशी जोडले आहेत.  गुजरातमध्ये जातीयवाद दिसून येत नाही. कारण तेथील लोक व्यवसायाभिमुख आहेत; परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातीयवाद पाहायला मिळतो, असे परखड प्रतिपादन पद्मश्री डॉ.एस. एल. भैरप्पा यांनी शनिवारी ठाण्यात केले.

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला. डॉ. उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सध्याच्या काळात आपल्या देशात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत; मात्र जेव्हा देशात चांगले घडते आहे तेव्हा विरोधकांची संख्या वाढते. वाल्मीकीनी रामायणात २४ मूल्ये सांगितली आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो या देशात जन्मलेला नाही त्यांनी या देशाचा राज्य कारभार चालवू नये, असेही ते म्हणाले. तंतू कादंबरी आजच्या काळाशी सुसंगत आहे हे सांगताना भैरप्पा म्हणाले की, तुम्ही भावनांशिवाय साहित्य लिहू शकत नाही आणि वैचारिकतेशिवाय ते टिकून राहू शकत नाही. कादंबरी लिहिणे ही एक कला आहे. साहित्य लिहिताना एखादी विचारधारा स्वीकारून लिहिणे सोपे आहे; पण ते स्वतःच्या विचारातून लिहिणे कठीण आहे. कादंबरी लिहिताना एखादे पात्र तयार केले पाहिजे आणि ते कोणत्या मूल्यामध्ये बसवायचे याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नवोदित लेखकांनी चांगले साहित्य वाचण्याची गरज आहे. इतर दर्जेदार कादंबरी, त्यांची तंत्र, मूल्ये यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या परंपरा जसे की, रामायण, महाभारत, कालिदास यांचे वाचन केले पाहिजे. सद्य:स्थितीवर सडेतोड लेखन आजच्या पिढीने केले पाहिजे. संशोधन, अध्ययन याकडे तरुणांनी वळावे,  असा सल्ला भैरप्पा यांनी दिला. दरम्यान, डॉ. उमा रामराव यांनी अनुवादित केलेले ‘संवादू अनुवादू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, ऋषीकुमार मिश्रा आदी उपस्थित होते. मकरंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.