शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

महाराष्ट्रात साहित्य निर्मितीवर जातीयवादाचा प्रभाव; पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:44 IST

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जातीयवाद ही फार मोठी समस्या लेखकांमध्ये जाणवत आहे. जातीयवादाचा वाईट प्रभाव साहित्य निर्मितीवर होऊ लागला आहे. राजकीय सोयीकरिता प्रसारमाध्यमे आणि साहित्यिकांकडून वस्तुस्थिती दुर्लक्षिली जाते. आताचे लेखक हे विशिष्ट विचारधारेशी जोडले आहेत.  गुजरातमध्ये जातीयवाद दिसून येत नाही. कारण तेथील लोक व्यवसायाभिमुख आहेत; परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातीयवाद पाहायला मिळतो, असे परखड प्रतिपादन पद्मश्री डॉ.एस. एल. भैरप्पा यांनी शनिवारी ठाण्यात केले.

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला. डॉ. उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सध्याच्या काळात आपल्या देशात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत; मात्र जेव्हा देशात चांगले घडते आहे तेव्हा विरोधकांची संख्या वाढते. वाल्मीकीनी रामायणात २४ मूल्ये सांगितली आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो या देशात जन्मलेला नाही त्यांनी या देशाचा राज्य कारभार चालवू नये, असेही ते म्हणाले. तंतू कादंबरी आजच्या काळाशी सुसंगत आहे हे सांगताना भैरप्पा म्हणाले की, तुम्ही भावनांशिवाय साहित्य लिहू शकत नाही आणि वैचारिकतेशिवाय ते टिकून राहू शकत नाही. कादंबरी लिहिणे ही एक कला आहे. साहित्य लिहिताना एखादी विचारधारा स्वीकारून लिहिणे सोपे आहे; पण ते स्वतःच्या विचारातून लिहिणे कठीण आहे. कादंबरी लिहिताना एखादे पात्र तयार केले पाहिजे आणि ते कोणत्या मूल्यामध्ये बसवायचे याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नवोदित लेखकांनी चांगले साहित्य वाचण्याची गरज आहे. इतर दर्जेदार कादंबरी, त्यांची तंत्र, मूल्ये यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या परंपरा जसे की, रामायण, महाभारत, कालिदास यांचे वाचन केले पाहिजे. सद्य:स्थितीवर सडेतोड लेखन आजच्या पिढीने केले पाहिजे. संशोधन, अध्ययन याकडे तरुणांनी वळावे,  असा सल्ला भैरप्पा यांनी दिला. दरम्यान, डॉ. उमा रामराव यांनी अनुवादित केलेले ‘संवादू अनुवादू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, ऋषीकुमार मिश्रा आदी उपस्थित होते. मकरंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.