शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात साहित्य निर्मितीवर जातीयवादाचा प्रभाव; पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:44 IST

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जातीयवाद ही फार मोठी समस्या लेखकांमध्ये जाणवत आहे. जातीयवादाचा वाईट प्रभाव साहित्य निर्मितीवर होऊ लागला आहे. राजकीय सोयीकरिता प्रसारमाध्यमे आणि साहित्यिकांकडून वस्तुस्थिती दुर्लक्षिली जाते. आताचे लेखक हे विशिष्ट विचारधारेशी जोडले आहेत.  गुजरातमध्ये जातीयवाद दिसून येत नाही. कारण तेथील लोक व्यवसायाभिमुख आहेत; परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातीयवाद पाहायला मिळतो, असे परखड प्रतिपादन पद्मश्री डॉ.एस. एल. भैरप्पा यांनी शनिवारी ठाण्यात केले.

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला. डॉ. उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सध्याच्या काळात आपल्या देशात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत; मात्र जेव्हा देशात चांगले घडते आहे तेव्हा विरोधकांची संख्या वाढते. वाल्मीकीनी रामायणात २४ मूल्ये सांगितली आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो या देशात जन्मलेला नाही त्यांनी या देशाचा राज्य कारभार चालवू नये, असेही ते म्हणाले. तंतू कादंबरी आजच्या काळाशी सुसंगत आहे हे सांगताना भैरप्पा म्हणाले की, तुम्ही भावनांशिवाय साहित्य लिहू शकत नाही आणि वैचारिकतेशिवाय ते टिकून राहू शकत नाही. कादंबरी लिहिणे ही एक कला आहे. साहित्य लिहिताना एखादी विचारधारा स्वीकारून लिहिणे सोपे आहे; पण ते स्वतःच्या विचारातून लिहिणे कठीण आहे. कादंबरी लिहिताना एखादे पात्र तयार केले पाहिजे आणि ते कोणत्या मूल्यामध्ये बसवायचे याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नवोदित लेखकांनी चांगले साहित्य वाचण्याची गरज आहे. इतर दर्जेदार कादंबरी, त्यांची तंत्र, मूल्ये यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या परंपरा जसे की, रामायण, महाभारत, कालिदास यांचे वाचन केले पाहिजे. सद्य:स्थितीवर सडेतोड लेखन आजच्या पिढीने केले पाहिजे. संशोधन, अध्ययन याकडे तरुणांनी वळावे,  असा सल्ला भैरप्पा यांनी दिला. दरम्यान, डॉ. उमा रामराव यांनी अनुवादित केलेले ‘संवादू अनुवादू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, ऋषीकुमार मिश्रा आदी उपस्थित होते. मकरंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.