शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

By पंकज पाटील | Updated: April 14, 2023 17:12 IST

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते.

बदलापूर: बदलापूर मानकीवली एमआयडीसीमध्ये असलेल्या रेडियंट केमिकल कंपनीत रसायन उतरवण्यासाठी आलेल्या टँकरलाच आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ऐरोलीच्या बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. रात्री ही केमिकल कंपनी बंद असल्याने त्या ठिकाणी टँकर उतरवण्यासाठी तिघा कामगारांना ठेवण्यात आले होते. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करणे आणि ते ज्वलनशील रसायन कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टॅंकमध्ये भरताना मोठी दक्षता घेण्याची गरज असते.

मात्र गुरुवारी हा टँकर आल्यानंतर त्याच्यातील रसायन कंपनीच्या टॅंकमध्ये भरत असताना अचानक त्या केमिकलने पेट घेतला. टँकरच्या केमिकलचा वॉल सुरू राहिल्याने हे संपूर्ण रसायन जळू लागले आणि त्यात कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये असलेला टँकर देखील अग्नीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच उल्हासनगर आणि अंबरनाथच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

ही या कंपनीत इतरत्र पसरू नये आणि शेजारी असलेल्या कंपनींना त्याची झळ बसू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्तीचे प्रयत्न केले. टँकर जवळ उभ्या असलेल्या दोघा कामगारांना या आगीची झळ बसली असून संजय पासवान आणि हे तरुण गंभीर रित्या भाजल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे.

अत्यंत ज्वलनशील रसायन हाताळत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ती सुरक्षा न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे देखील आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीत टाकण्यात येणारे रसायन हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याच्याजवळ मोबाईल देखील वापरणे धोकादायक असते.

आगीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने देखील फळ काढला. त्यामुळे कंपनीची सुरक्षा किती ढिसाळ होती हे उघड झाले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी