शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

By पंकज पाटील | Updated: April 14, 2023 17:12 IST

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते.

बदलापूर: बदलापूर मानकीवली एमआयडीसीमध्ये असलेल्या रेडियंट केमिकल कंपनीत रसायन उतरवण्यासाठी आलेल्या टँकरलाच आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ऐरोलीच्या बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. रात्री ही केमिकल कंपनी बंद असल्याने त्या ठिकाणी टँकर उतरवण्यासाठी तिघा कामगारांना ठेवण्यात आले होते. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करणे आणि ते ज्वलनशील रसायन कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टॅंकमध्ये भरताना मोठी दक्षता घेण्याची गरज असते.

मात्र गुरुवारी हा टँकर आल्यानंतर त्याच्यातील रसायन कंपनीच्या टॅंकमध्ये भरत असताना अचानक त्या केमिकलने पेट घेतला. टँकरच्या केमिकलचा वॉल सुरू राहिल्याने हे संपूर्ण रसायन जळू लागले आणि त्यात कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये असलेला टँकर देखील अग्नीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच उल्हासनगर आणि अंबरनाथच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

ही या कंपनीत इतरत्र पसरू नये आणि शेजारी असलेल्या कंपनींना त्याची झळ बसू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्तीचे प्रयत्न केले. टँकर जवळ उभ्या असलेल्या दोघा कामगारांना या आगीची झळ बसली असून संजय पासवान आणि हे तरुण गंभीर रित्या भाजल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे.

अत्यंत ज्वलनशील रसायन हाताळत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ती सुरक्षा न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे देखील आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीत टाकण्यात येणारे रसायन हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याच्याजवळ मोबाईल देखील वापरणे धोकादायक असते.

आगीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने देखील फळ काढला. त्यामुळे कंपनीची सुरक्षा किती ढिसाळ होती हे उघड झाले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी