शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

By पंकज पाटील | Updated: April 14, 2023 17:12 IST

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते.

बदलापूर: बदलापूर मानकीवली एमआयडीसीमध्ये असलेल्या रेडियंट केमिकल कंपनीत रसायन उतरवण्यासाठी आलेल्या टँकरलाच आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ऐरोलीच्या बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. रात्री ही केमिकल कंपनी बंद असल्याने त्या ठिकाणी टँकर उतरवण्यासाठी तिघा कामगारांना ठेवण्यात आले होते. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करणे आणि ते ज्वलनशील रसायन कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टॅंकमध्ये भरताना मोठी दक्षता घेण्याची गरज असते.

मात्र गुरुवारी हा टँकर आल्यानंतर त्याच्यातील रसायन कंपनीच्या टॅंकमध्ये भरत असताना अचानक त्या केमिकलने पेट घेतला. टँकरच्या केमिकलचा वॉल सुरू राहिल्याने हे संपूर्ण रसायन जळू लागले आणि त्यात कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये असलेला टँकर देखील अग्नीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच उल्हासनगर आणि अंबरनाथच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

ही या कंपनीत इतरत्र पसरू नये आणि शेजारी असलेल्या कंपनींना त्याची झळ बसू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्तीचे प्रयत्न केले. टँकर जवळ उभ्या असलेल्या दोघा कामगारांना या आगीची झळ बसली असून संजय पासवान आणि हे तरुण गंभीर रित्या भाजल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे.

अत्यंत ज्वलनशील रसायन हाताळत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ती सुरक्षा न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे देखील आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीत टाकण्यात येणारे रसायन हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याच्याजवळ मोबाईल देखील वापरणे धोकादायक असते.

आगीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने देखील फळ काढला. त्यामुळे कंपनीची सुरक्षा किती ढिसाळ होती हे उघड झाले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी