शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

By पंकज पाटील | Updated: April 14, 2023 17:12 IST

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते.

बदलापूर: बदलापूर मानकीवली एमआयडीसीमध्ये असलेल्या रेडियंट केमिकल कंपनीत रसायन उतरवण्यासाठी आलेल्या टँकरलाच आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ऐरोलीच्या बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. रात्री ही केमिकल कंपनी बंद असल्याने त्या ठिकाणी टँकर उतरवण्यासाठी तिघा कामगारांना ठेवण्यात आले होते. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करणे आणि ते ज्वलनशील रसायन कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टॅंकमध्ये भरताना मोठी दक्षता घेण्याची गरज असते.

मात्र गुरुवारी हा टँकर आल्यानंतर त्याच्यातील रसायन कंपनीच्या टॅंकमध्ये भरत असताना अचानक त्या केमिकलने पेट घेतला. टँकरच्या केमिकलचा वॉल सुरू राहिल्याने हे संपूर्ण रसायन जळू लागले आणि त्यात कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये असलेला टँकर देखील अग्नीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच उल्हासनगर आणि अंबरनाथच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

ही या कंपनीत इतरत्र पसरू नये आणि शेजारी असलेल्या कंपनींना त्याची झळ बसू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्तीचे प्रयत्न केले. टँकर जवळ उभ्या असलेल्या दोघा कामगारांना या आगीची झळ बसली असून संजय पासवान आणि हे तरुण गंभीर रित्या भाजल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे.

अत्यंत ज्वलनशील रसायन हाताळत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ती सुरक्षा न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे देखील आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीत टाकण्यात येणारे रसायन हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याच्याजवळ मोबाईल देखील वापरणे धोकादायक असते.

आगीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने देखील फळ काढला. त्यामुळे कंपनीची सुरक्षा किती ढिसाळ होती हे उघड झाले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी