शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

सोयाबीनवर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

ठाणे : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव ...

ठाणे : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. चक्री भुंगा ही कीड सध्याच्या पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाला वरपर्यंत अन्नपुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. त्यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

चक्री भुंग्याची अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाययोजना न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव आढळून आल्यास वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेली झाडे, पाने, फांद्या यांच्यातील कीड नष्ट होणे गरजेचे आहे. या पद्धतीचा १५ दिवसांतून दोनदा अवलंब केला तर चक्री भुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होईल, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, यासाठी सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन ५० टक्के, ३० मिली प्रति १० लिटर अथवा थायक्लोप्रीड २१.७. एस.सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आणि लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, झेडसी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक विकास पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.