शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सोयाबीनवर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

ठाणे : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव ...

ठाणे : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. चक्री भुंगा ही कीड सध्याच्या पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाला वरपर्यंत अन्नपुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. त्यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

चक्री भुंग्याची अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाययोजना न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव आढळून आल्यास वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेली झाडे, पाने, फांद्या यांच्यातील कीड नष्ट होणे गरजेचे आहे. या पद्धतीचा १५ दिवसांतून दोनदा अवलंब केला तर चक्री भुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होईल, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, यासाठी सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन ५० टक्के, ३० मिली प्रति १० लिटर अथवा थायक्लोप्रीड २१.७. एस.सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आणि लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, झेडसी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक विकास पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.