शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना ठरवले अपात्र

By admin | Updated: May 11, 2017 01:53 IST

राज्य सरकारने २०१६ काढलेल्या सरकारच्या निर्णयाचा आधार घेत अंबरनाथ पालिकेने वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : राज्य सरकारने २०१६ काढलेल्या सरकारच्या निर्णयाचा आधार घेत अंबरनाथ पालिकेने वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट होणाऱ्या कामगारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारचे आदेश स्पष्ट नसल्याने जातीच्या आधारावर नोकरी नाकारु नये असा महत्वपूर्ण निर्णय घेत जे अपात्र वारसदार होते त्यांचे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा निर्णय अंबरनाथ पालिकेने घेतला. जी प्रकरणे २००९ पासून प्रलंबित आहेत त्या वारसांना २०१६ चा निर्णय कसा लागू होणार असा सवाल नगरसेवकांनी केला आहे. यावर मुख्याधिकाऱ्यांनी ही प्रकरणे अभिप्रायासाठी सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेत ही सर्व प्रकरणे अपात्र न ठरविता प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट करण्याचे अनेक सफाई कामगारांची प्रकरणे प्रलंबित होती. या प्रलंबित प्रकरणासंदर्भात योग्य कार्यवाही न झाल्याने अनेक वर्षापासून सफाई कामगारांचे वारस हे नोकरीसाठी पालिकेत खेटे घालत होते. मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी या प्रलंबित प्रकरणातील वारसांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तत: करून पात्र उमेदवारांची यादी तयार केली. त्यात काही प्रकरणे ही प्रलंबित तर काही प्रकरणे ही अपात्र ठरवली. पालिकेच्या सर्वसाधारणसभेत ६४ वारसाहक्क असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून त्याला मंजुरी घेण्यात येणार होती. ६४ पैकी ३९ वारस हे पात्र ठरविले होते. तर १९ उमेदवार हे कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली. मात्र उर्वरित सहा वारसांना अपात्र ठरविण्यात आले होते. या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेकडे खुलासा मागितल्यावर राज्य सरकारच्या २०१६ च्या नव्या आदेशामुळे अपात्र ठरविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सरकारने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करताना अनुसूचित जातीच्या वारसांना प्राधान्याने समाविष्ट करावे असे आदेश काढले. या आदेशाच्या आधारावरच पालिका प्रशासनाने अनुसूचित जातीच्या वारसांना सोडले तर उर्वरित सर्व जातीच्या उमेदवारांना नोकरी नाकारली. सरकारी आदेशानुसार पालिकेने कार्यवाही केल्याचे मुख्याधिकारी देशमुख यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र केवळ जातीच्या आधारावर नोकरी नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही असे स्पष्ट मत काँग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केले. जी प्रकरणे २०१६ पूर्वीची म्हणजे आदेशापूर्वीची आहेत त्यांना हा आदेश लागू कसा होणार असा सवालही विचारला. वारसाहक्काची प्रकरणे ही २००९ पासून प्रलंबित आहेत. पालिकेने ही प्रकरणे निकाली काढण्यास विलंब लावल्याने २०१६ च्या आदेशामुळे काही वारसांना अपात्र ठरविले.सरकारचा आदेश जरी अनुसूचित विभागातील वारसांना प्राधान्य देण्याचे असले तरी इतर जातींना नाकारावे असा उल्लेख कुठेच केलेला नाही. त्यामुळे अन्य जातीच्या वारसांनाही नोकरीचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी उचलून धरली. मुख्याधिकाऱ्यांनाही सरकारचा अभिप्राय मागितल्यावरच हे प्रकरण निकाली काढले जातील असे आश्वासन दिले.