शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शहापूर तालुक्यात प्रथमच इंद्रायणी भात शेतीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:16 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तालुक्यात सर्वत्र राबविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तालुक्यामध्ये इंद्रायणी या नवीन भातबियाण्याची प्रथमच ओलिताखाली असणाऱ्या आवरे या गावाची निवड करून लागवड करण्यात आली आहे. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इंद्रायणी या भातपिकामुळे अतिशय कमी वेळामध्ये आणि केवळ बेड पद्धतीने या पिकांची लागवड केल्याने एकाचवेळी बियाणे पेरण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, मजुरी वाचून खर्च कमी होतो, अधिक उत्पादन मिळते व वारंवार जमीन उखळावी लागत नसल्याने जमिनीचा पोत कमी होत नाही. सुपीकता कायम राहत असल्याने भातबियाणे अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यातील आवरे गावातील ३५ शेतकऱ्यांना ४०० किलो भातबियाण्यांचे वाटप केवळ प्रायोजित पद्धतीने करण्यात आले असून त्यासाठीचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे किमान ३५ एकर जमिनीत हे पीक घेण्यात येत आहे. हा पिकविलेला भात २५ रुपये किलो दराने विकत घेण्यात येणार असून यासाठी गावातील शेतकरी रोहित घरत हे शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रोत्साहित करीत आहेत. ९० ते ९५ दिवसांचे हे पीक असून ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.