शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहापूर तालुक्यात प्रथमच इंद्रायणी भात शेतीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:16 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तालुक्यात सर्वत्र राबविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तालुक्यामध्ये इंद्रायणी या नवीन भातबियाण्याची प्रथमच ओलिताखाली असणाऱ्या आवरे या गावाची निवड करून लागवड करण्यात आली आहे. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इंद्रायणी या भातपिकामुळे अतिशय कमी वेळामध्ये आणि केवळ बेड पद्धतीने या पिकांची लागवड केल्याने एकाचवेळी बियाणे पेरण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, मजुरी वाचून खर्च कमी होतो, अधिक उत्पादन मिळते व वारंवार जमीन उखळावी लागत नसल्याने जमिनीचा पोत कमी होत नाही. सुपीकता कायम राहत असल्याने भातबियाणे अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यातील आवरे गावातील ३५ शेतकऱ्यांना ४०० किलो भातबियाण्यांचे वाटप केवळ प्रायोजित पद्धतीने करण्यात आले असून त्यासाठीचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे किमान ३५ एकर जमिनीत हे पीक घेण्यात येत आहे. हा पिकविलेला भात २५ रुपये किलो दराने विकत घेण्यात येणार असून यासाठी गावातील शेतकरी रोहित घरत हे शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रोत्साहित करीत आहेत. ९० ते ९५ दिवसांचे हे पीक असून ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.