शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अवकाळी पावसाचे त्यांनी आधीच दिले होते संकेत...

By admin | Updated: March 18, 2017 03:46 IST

राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.

ठाणे : राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. हे भाकित वर्तवतानाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचे भविष्यही त्यांनी वर्तवले आहे. मात्र, हा अपघात नेमका कुठे होणार, हे ठिकाण अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. ते लवकरच सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अवकाळी पावसाच्या आपल्या भाकिताबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनादेखील कल्पना दिली होती. मात्र, त्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यानेच राज्यात सात लाख हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाले. काही बळी गेले. गांभीर्याने दखल घेतली असती तर कदाचित हे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता आले असते असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून राज्यातील यवतमाळ, नागपूर, लातूर, पंढरपूर आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पावसाबाबतचे हे भविष्य आठवडाभर आधीच वर्तवल्याचे ते म्हणाले. शिवाय, साळगावकर यांच्या फेसबुक पेजवर देखील त्याचा उल्लेख असल्याचे ते सांगतात. २०१७ मध्ये राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असेल असेही त्यांनी सांगितले. जूनमध्ये तुरळक पाऊस पडणार असून जुलैच्या दुसऱ्या आठड्यापासून पाऊस चांगली हजेरी लावेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. (प्रतिनिधी) - येत्या मे अखेर म्हणजेच शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचेही भविष्य त्यांनी वर्तविले आहे. परंतु,हा अपघात कुठे होणार याची कल्पना मात्र त्यांनी दिलेली नाही. ती लवकरच दिली जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.