शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

फ्रान्सच्या तुलनेत भारत व्यसनमुक्त होण्याचे प्रमाण 70 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:30 IST

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात.

डोंबिवली- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात. याउलट फ्रान्सचा अभ्यास केला असता तिथे आधुनिक सोयीसुविधा दिल्या जात असल्या तरी केवळ 3 टक्केच रूग्ण बरे होतात. भारतात कुटुंबियांकडून मिळणारा आधार यामुळे रूग्णाची बरी होण्याची शक्यता वाढते. हा सपोर्ट फ्रान्समध्ये रूग्णाला मिळत नाही, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. 

मनोदय ट्रस्ट व मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर यांच्या वर्धापन दिन व जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त एक पाऊल व्यसनमुक्तीकडे .. या कार्यक्रमांतर्गत डॉ. आनंद नाडकर्णी लिखीत मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन व चर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पुणतांबेकर बोलत होत्या. हा कार्यक्रम रविवारी ब्राह्मण सभेत पार पडला. मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन प्रसिध्द अभिनेता सुयश टिळक आणि वेध अॅक्टींग अकादमीच्या मधुरा ओक यांनी केले. द्विज पुरस्काराने सन्मानित समाजसेवक मधुकर गिते यांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला. मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना पुणतांबेकर आणि मधुकर गिते यांनी उत्तरे दिली.

पुणतांबेकर म्हणाल्या, व्यसनधीन रू ग्ण हा उपचारापेक्षा कुटुंबियांच्या आधारामुळे अधिक सुधारतो. उपचार घेतल्यानंतर केंद्राशी संपर्कात राहणो गरजेचे असते. रूग्णाला टेन्शन येत असेल तर समुपदेशन केले जाते. एखादा उपचार घेतल्यावर दारूच्या पहिल्या ग्लासापासून दूर राहावे लागते. नाहीतर आजार पुन्हा उलटू शकतो. त्यासाठी रूग्णाला पथ्यांचे पालन करावे लागते. व्यसनधीनता हा कुटुंबाचा आजार आहे. त्यामुळे सगळ्य़ांना बदलण्याची गरज आहे. व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रस होतो. त्यांच्या व्यसनाधीनतेचा त्रस महिलेला अधिक होतो. त्यामुळे महिलांमध्ये अपराधीची भावना निर्माण होते. व्यसनधीन व्यक्ती रात्री व्यसन करून घरी येते तेव्हा कुटुंबियांनी नकारत्मक भावनेचा विचार करावा. त्या व्यक्तीला काहीही बोलू नये. ती व्यक्ती मुद्दाम भांडण काढण्याचा प्रयत्न करते. कारण त्या व्यक्तीला भांडण न केल्यास सकाळी अपराधीपणाची भावना निर्माण होते. चौकट-इंटरनेटचा सतत वापर हे देखील एक व्यसनच इंटरनेटचे व्यसन ही सध्या पाहायला मिळते. आपण गॅजेटवर अधिक अवलंबून राहू लागलो आहे. याला आयएडी म्हणजेच वर्तनात्मक व्यसन म्हटले जाते. या रूग्णासाठी मुक्तांगणमध्ये एक वेगळे विभाग तयार करावा लागला. एखाद्या गोष्टीचा दुरूपयोग आपण करीत नाही ना हे पाहिले पाहिजे. विवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे. इंटरनेट, फोन दिवसातून एवढाच वेळ वापरला पाहिजे हे मनाशी पक्के केले पाहिजे. जेवताना टीव्ही बंद करून कुटुंबियांशी संवाद साधला गेला पाहिजे. मुलांना जेवताना ही मोबाईल हातात लागतो. या मुलांना पुन्हा चिऊ-काऊच्या गोष्टीकडे घेवून जाण्याची गरज आहे. पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम दिला पाहिजे. जो वेळ मुलांना दयाल त्यात मग टीव्ही, मोबाईल नक ो. आपण कसे वागतो याकडे मुलांचे लक्ष असते. त्यामुळे स्वत:मध्ये बदल करा, असे ही पुणतांबेकर यांनी सांगितले.