शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तरीही कल्याण-डोंबिवली तहानलेलीच..!

By admin | Updated: December 14, 2015 01:09 IST

कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. योजना पूर्ण झाल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. योजना पूर्ण झाल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याची पूर्तता केली जात नाही. पाणी कपातीच्या नावाखाली कल्याण पूर्वेला केवळ ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. योजना तयार करताना महापालिकेने लोकसंख्येच्या आधारवर पाण्याचे नियोजन केलेले नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांना औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा करते. ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा या गावांना केला जातो. ही गावे महापालिकेत नव्हती तेंव्हापासून गावांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. आत्ता महापालिकेत समाविष्ट झाल्यावरही या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. ग्रामपंचायतींनी महामंडळाने दिलेल्या पाणी जोडण्यांवर महामंडळाची परवानगी न घेताच नव्या इमारती व चाळींना बेसुमार नळ जोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवली आहे. पाणी पुरवठ्याची योजना महापालिकेने हाती घेण्याऐवजी महामंडळाकडेच असावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. शहर व ग्रामीण भागात पाण्याची चोरी भरमसाठ आहे. तसेच पाण्याची गळतीही जास्त आहे. महापालिका उल्हास नदीतून दररोज तीनशे दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करते. लघुपाटबंधारे खात्याने ३० टक्के पाणी कपात लागू केल्याने शहर व ग्रामीण भागात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. महापालिका हद्दीत पाण्याच्या गळतीचे प्रमाण २००८ नुसार २१ टक्के आहे. जागतिक निकषानुसार ते १५ टक्के असणे आवश्यक आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. गळती रोखण्यासाठी सर्वेक्षणाचे टेंडर महापालिकेच्या पाणी खात्याकडून काढण्यात येणार आहे. महापालिकेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली असली तर स्वत:चे धरण महापालिकेने घेतले नाही. महापालिका उल्हास नदीतून पाणी उचलते. त्या नदीत बारवी व आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. बारवी धरणावर महामंडळाची तर आंध्र धरणावर टाटा कंपनीची मालकी आहे. मोरबे धरण तयार होत असताना ते कल्याण-डोंबिवली महापालिकेने खरेदी करावे, असा प्रयत्न तत्कालीन भाजप नगरसेवक नंदू जोशी यांनी केले होेते. ते धरण नवी मुंबई महापालिकेने खरेदी केले. मोरबे धरण झाल्यावर ५९ दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली महापालिकेस देण्यात येईल. हा निर्णय २००८ साली होऊनदेखील त्याची अंमलबजावणी न झाल्याने ते पाणी आजही नवी मुंबईलाच पुरविले जात आहे. एप्रिल २०१५ साली पार पडलेल्या बैठकीत कल्याण-डोंबिवलीस मोरबे धरणाच्या बदल्यात पाणी देण्यास सरकारने नकार दिला आहे.