शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास १ रुपयाने महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १८ ऐवजी आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत. येथील रिक्षाचालक तसेही पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये आकारायचे. त्यामुळे डोंबिवलीकरांना नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल.

काही वर्षे डोंबिवलीकर पहिल्या टप्प्यासाठी मीटर नसताना स्वतंत्र रिक्षा केली तर २० रुपये मोजत होते. त्यात आता १ रुपया वाढणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शेअर भाड्यात पहिल्या टप्प्यासाठी आता जे १० रुपये आकारले जातात, त्यात वाढ होणार नसल्याचे ते म्हणाले. परंतु लांबच्या टप्प्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून त्याबाबत आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. २०१४ पासून रोखून धरलेली प्रलंबित व कायदेशीर हक्काची रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ दिल्याबद्दल लालबावटा रिक्षा युनियनतर्फे या भाववाढीचे स्वागत करण्यात आले.

२०१४ पासून सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. सर्व वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. फक्त रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ रोखण्यात आली होती. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत हकिम समिती व खटुआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टॅक्सीची भाववाढ रोखून धरली होती. आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टॅक्सी संघटना या भाववाढीची मागणी करत होत्या.

२०२० मध्ये लाॅकडाऊनमुळे सहा महिने रिक्षा-टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यांनंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा, काॅलेज आदी बंद असल्याने रिक्षा-टॅक्सींचा पन्नास टक्के धंदा कमी झाला होता. एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, कॉलेज सुरू झाले तरीही धंदा पूर्वीसारखा होत नसे. त्यातच आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टॅक्सीचालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का, याबाबत प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा, टॅक्सीचालक, मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. वित्त कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षाचालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन सरकारने रिक्षाचालकांना फार मोठा दिलासा देऊन भाडेवाढीचा प्रश्न सोडविला आहे. याबद्दल अनिल परब यांचे डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आभार मानले.