शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास १ रुपयाने महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १८ ऐवजी आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत. येथील रिक्षाचालक तसेही पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये आकारायचे. त्यामुळे डोंबिवलीकरांना नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल.

काही वर्षे डोंबिवलीकर पहिल्या टप्प्यासाठी मीटर नसताना स्वतंत्र रिक्षा केली तर २० रुपये मोजत होते. त्यात आता १ रुपया वाढणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शेअर भाड्यात पहिल्या टप्प्यासाठी आता जे १० रुपये आकारले जातात, त्यात वाढ होणार नसल्याचे ते म्हणाले. परंतु लांबच्या टप्प्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून त्याबाबत आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. २०१४ पासून रोखून धरलेली प्रलंबित व कायदेशीर हक्काची रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ दिल्याबद्दल लालबावटा रिक्षा युनियनतर्फे या भाववाढीचे स्वागत करण्यात आले.

२०१४ पासून सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. सर्व वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. फक्त रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ रोखण्यात आली होती. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत हकिम समिती व खटुआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टॅक्सीची भाववाढ रोखून धरली होती. आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टॅक्सी संघटना या भाववाढीची मागणी करत होत्या.

२०२० मध्ये लाॅकडाऊनमुळे सहा महिने रिक्षा-टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यांनंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा, काॅलेज आदी बंद असल्याने रिक्षा-टॅक्सींचा पन्नास टक्के धंदा कमी झाला होता. एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, कॉलेज सुरू झाले तरीही धंदा पूर्वीसारखा होत नसे. त्यातच आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टॅक्सीचालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का, याबाबत प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा, टॅक्सीचालक, मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. वित्त कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षाचालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन सरकारने रिक्षाचालकांना फार मोठा दिलासा देऊन भाडेवाढीचा प्रश्न सोडविला आहे. याबद्दल अनिल परब यांचे डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आभार मानले.