शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

साई पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व : आशा इदनानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

उल्हासनगर : शहराच्या राजकारणात स्थानिक साई पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या अध्यक्षा नगरसेवक ...

उल्हासनगर : शहराच्या राजकारणात स्थानिक साई पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या अध्यक्षा नगरसेवक आशा इदनानी यांनी दिली. साई पक्षाचे गटनेता गजानन शेळके हे भाजप पक्षासोबत नसल्याचे स्पष्ट केले.

उल्हासनगरात स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून भाजप-शिवसेना आमनेसामने आले. भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, रिपाइं व साई पक्ष सोबत असल्याचे सांगितले. याला साई पक्षाच्या अध्यक्षा व नगरसेवक आशा इदनानी यांनी आक्षेप घेतला असून, साई पक्षाचे शहरात स्वतंत्र अस्तित्व असल्याचे सांगितले. साई पक्षाने यापूर्वी राजकीय महत्त्वपूर्ण भूमिका वठविली असून, पक्षाला दोन वेळा महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाचा मान मिळाला आहे. गेल्या महापौर निवडणुकीदरम्यान पक्षाचे १२ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये समाविष्ट झाले. साई पक्षाच्या नगरसेवकांमुळे भाजपची संख्या ३२ वरून ४२ झाली. महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आशा इदनानी यांनी सांगितले.

साई पक्षाच्या सर्वेसर्वा आशा इदनानी यांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत साई पक्ष यापूर्वीप्रमाणे महत्त्वपूर्ण भूमिका वठविणार असून, साई पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता महापालिकेत येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे गजानन शेळके महापालिका गटनेते असल्याचे त्या म्हणाल्या.