शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

वाढवण, जिंदालविरोधात एल्गार

By admin | Updated: December 12, 2015 00:58 IST

केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार

पालघर : केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार, शेतकरी, डायमेकर इ. देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करीत अस्तित्वाच्या लढाईसाठी मुंबई ते थेट झाई पर्यंतच्या मच्छीमार, शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता.रद्द करा, रद्द करा वाढवण, जिंदाल रद्द करा, समुद्र आमच्या कोळ्यांचा नाही कुणाच्या बापाचा, काटेंगे काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे अशा उद्वेगपूर्ण घोषणा देत मच्छीमार महिलांचा मोठा सहभाग असलेल्या १५ ते २० हजार मच्छीमारांच्या मोर्च्याने आज पालघर शहराचा परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाजसंघ, पालघर, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी पालघर समाज संघाकडून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर, अनंत तरे, राजेंद्र मेहेर, किरण कोळी, अशोक नाईक, नारायण पाटील, अशोक अंभीरे, नारायण विंदे, ज्योती मेहेर, उज्वला पाटील, दामोदर तांडेल इ. मान्यवर उपस्थित होते.पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुक्यातील वाढवण येथे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन महाकाय बंदर बांधण्याची घोषणा करण्यात आली असून या बंदरामुळे मुंबई ते झाई पर्यंतचे मच्छीमार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. १९९७ साली युतीच्या सरकारने बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांच्या उग्र आंदोलन व डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरणाच्या आदेशानंतर युती सरकारने बंदर रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु पुन्हा ते सत्तेत आल्यानंतर वाढवण बंदर होणारच अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)