शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

वाढवण, जिंदालविरोधात एल्गार

By admin | Updated: December 12, 2015 00:58 IST

केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार

पालघर : केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार, शेतकरी, डायमेकर इ. देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करीत अस्तित्वाच्या लढाईसाठी मुंबई ते थेट झाई पर्यंतच्या मच्छीमार, शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता.रद्द करा, रद्द करा वाढवण, जिंदाल रद्द करा, समुद्र आमच्या कोळ्यांचा नाही कुणाच्या बापाचा, काटेंगे काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे अशा उद्वेगपूर्ण घोषणा देत मच्छीमार महिलांचा मोठा सहभाग असलेल्या १५ ते २० हजार मच्छीमारांच्या मोर्च्याने आज पालघर शहराचा परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाजसंघ, पालघर, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी पालघर समाज संघाकडून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर, अनंत तरे, राजेंद्र मेहेर, किरण कोळी, अशोक नाईक, नारायण पाटील, अशोक अंभीरे, नारायण विंदे, ज्योती मेहेर, उज्वला पाटील, दामोदर तांडेल इ. मान्यवर उपस्थित होते.पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुक्यातील वाढवण येथे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन महाकाय बंदर बांधण्याची घोषणा करण्यात आली असून या बंदरामुळे मुंबई ते झाई पर्यंतचे मच्छीमार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. १९९७ साली युतीच्या सरकारने बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांच्या उग्र आंदोलन व डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरणाच्या आदेशानंतर युती सरकारने बंदर रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु पुन्हा ते सत्तेत आल्यानंतर वाढवण बंदर होणारच अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)