शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ, तर महिलांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:25 IST

भारतात ५० वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे आणि त्यांच्या सहकारी प्रियंका सिद्धेश्वर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

- निलेश धोपेश्वरकर ठाणे : भारतात ५० वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे आणि त्यांच्या सहकारी प्रियंका सिद्धेश्वर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण ६८ टक्के आहे. पण, याबाबत कुणीच बोलत नाही. सरकारही वास्तव मांडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.सध्याच्या आधुनिक युगात जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र, हे करत असतानाच अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातूनच, नैराश्य येते आणि ती व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते. जर या आत्महत्या रोखायच्या असतील, तर सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्पलाइन सुरू केली पाहिजे, जेणेकरून आपले ऐकणारे कुणीतरी आहे, ही भावना निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.दि. १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने देशपांडे आणि सिद्धेश्वर यांनी पुरुषांच्या आत्महत्यांबाबत संशोधनात्मक पेपर सादर केला. यात त्यांनी १९६४ ते २०१३ या ५० वर्षांतील आत्महत्यांच्या घटनांचा आढावा घेतला आहे. त्यातून, त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. आत्महत्या करणाºया पुरुषांमध्ये अभियंते, डॉक्टर, मॅनेजर अशी उच्चशिक्षित मंडळी असल्याकडे या दोघांनी लक्ष वेधले.१९६४ मध्ये एकूण आत्महत्या करणाºयांची संख्या ३३ हजार ६२५ होती. ती वाढून २०१३ मध्ये एक लाख ३४ हजार ७९९ झाली. एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्या करणाºयांचे प्रमाण ७.१ वरून ११ इतके झाले. २०१० या वर्षात हे प्रमाण ११.४ इतके झाल्याचे ते म्हणाले. मागील दोन वर्षांत महिलांमधील आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले असतानाच पुरुषांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. महिलांनी आत्महत्या केलेल्यांमध्ये गृहिणींचे प्रमाण अधिक असल्याचे या दोघांनी सांगितले.सन २०११ मध्ये देशात सर्वाधिक आत्महत्यांच्या घटना घडल्या. त्यावर्षी एक लाख ३५ हजार ५८५ जणांनी आत्महत्या केल्या. तर, २०१३ मध्ये एकूण आत्महत्या करणाºयांची संख्या कमी होऊन एक लाख ३४ हजार ७९९ इतकी झाली. पण, पुरुषांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०११ मध्ये ८७ हजार ८३९ पुरुषांनी आत्महत्या केल्या, तर २०१३ मध्ये ९० हजार ५४३ पुरुषांनी आत्महत्या केल्या. दुसºया बाजूला महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याची समाधानकारक बाब दिसून आली. २०११ मध्ये ४७ हजार ७४६ महिलांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण २०१३ मध्ये ९.५ टक्क्यांनी कमी होऊन आत्महत्या करणाºया महिलांची संख्या ४४ हजार २५६ इतकी झाली. विवाहितांच्या आत्महत्यांमध्येही घट झाली आहे. २०११ मध्ये ३२ हजार ५८२ विवाहित महिलांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०१३ मध्ये २९ हजार ४९१ महिलांनी आत्महत्या केल्या. त्याचवेळी २०१३ मध्ये ६४ हजार ९८ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याचे या दोघांनी नमूद केले.>कौटुंबिक वाद, आजारपण ही प्रमुख कारणेपुरुषांच्या आत्महत्यांमागे प्रामुख्याने कौटुंबिक वाद आणि आजारपण ही प्रमुख कारणे आहेत. कौटुंबिक अडचणींमुळेपुरुषांनी आत्महत्या केल्याचे देशपांडे, सिद्धेश्वर यांनी सांगितले. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करणाºया पुरुषांचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.>३० ते ४४ वयोगटांत सर्वाधिक आत्महत्या१५ ते २९ वयोगटांतील पुरुषांचे आत्महत्यांचे प्रमाण