शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

ठाण्यात कोरोनाचे ५०० बेड वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

ठाणे : मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाला रोखा. परंतु, नियमांचे पालन करणे ...

ठाणे : मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाला रोखा. परंतु, नियमांचे पालन करणे जर शक्य होणार नसेल, तर केवळ निर्बंध घालून उपयोग नाही. त्यासाठी नागपूरप्रमाणेच पूर्णवेळ कडक लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला. शिवाय, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाचे ५०० बेड वाढविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ठाण्यात ५६३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात रोजच्या रोज २०० ते ३०० रुग्ण शहरात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि सर्व प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांची बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयुक्तांनी घेतली होती. यावेळी समन्वय साधून त्यांनी कोरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत.

* अर्ध्या तासात मिळणार रुग्णवाहिका

रुग्णसंख्या वाढत असली तरी ठाण्यात कोविड सेंटर पुरेसे आहेत. रुग्णवाहिकेची सुविधा अर्ध्या तासात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पुरेसा औषधसाठा आहे. शहरात विविध रुग्णालयांत पुरेसे बेड उपलब्ध असून आणखी ५०० बेड वाढविल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. व्हेटिंलेटरदेखील पुरेशा प्रमाणात असून घरोघरी जाऊन ताप सर्व्हे पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

-९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले

सध्या रुग्ण वाढत असले तरी त्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जास्तीचे असून आजघडीला ९० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्तांनादेखील महत्त्वाच्या जबाबदा-या दिल्या असून कोणत्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत, त्यामागची कारणे कोणती आहेत, याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

- दक्षता समिती घेणार कोरोनाचा आढावा

कोरोना दक्षता समिती स्थापन करून त्या माध्यमातून कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोविड सेंटरसह विलगीकरण केंद्रही सज्ज केले असून त्याठिकाणी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. कोरोनासाठीचा कंट्रोल रूमही सज्ज असून नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

-टीएमटी बसमध्ये ५० टक्के क्षमतेला परवानगी

ठाणे परिवहनच्या बसमधून ५० टक्के क्षमतेनेच प्रवास करण्याची मुभा दिली असून एक आसन सोडून बसण्याची परवानगी आहे. याचे पालन प्रवाशांनी करावे, असे आवाहन करून शेअर रिक्षांमधूनही जास्तीच्या प्रवाशांना परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नियमांचे पालन करणे नागरिकांची जबाबदारी

ठाणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, नियम पाळण्याची जबाबदारी ही नागरिकांचीदेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन केले तर नक्कीच कोरोनाला रोखण्यात यश येईल, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.