शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आतापर्यंत न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:29 IST

ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात एक हजार ९६.२० मिमी. पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी. नोंद घेतली. आतापर्यंत ५११.८२ मिमी . पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.

ठळक मुद्दे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढलामोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आलेकल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात ही पडत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात तो भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याभरात आतापर्यंत ७३.१३ टक्के पाऊस पडला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणाी साठा वाढला असल्याचे आढळून आले आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणी साठाहोता. तो ओज ६४ टक्के आहे. रात्रभरात ६ टक्के पाणी साठा सर्वाधिक मोठ्या असलेल्या भातसा धरणात वाढला आहे. या प्रमाणेच तानसामध्ये ९२ टक्के साठा असून रात्रभरात तो १२ टक्केने वाढला. या धरणात आज ९९ मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणातही १२ टक्के पाणी साठा वाढून तो ८२.१९ टक्के झाला. बारवीची पाण्याची पातळी सध्या ६६.४४ मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास बारवी भरण्याची शक्यता आहे. बारवी आत २०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात ९५ टक्के पाणी साठा होता.उल्हासनदीला पाणी पुरवठा करणार आंध्रा धरणाची सध्या १६०.९० मीटर पातळी आहे. ४७.४४ टक्के पाणी साठा असलेल्या आंध्रामध्ये देखील रात्रभरात ४ टक्के पाणी साठा वाढला आहे. या धरणात आज ८० मिमी पाऊस पडला. तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रि या होईल. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली,टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहात असल्याने तेथील वाहतूक देखील बंद करावी लागली. संततधार पावसामुळे धरणाचा पाणी साठा वाढत आहे. याच प्रमाणे बदलापूर बंधारा देखील धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्याची धोका पातळी १७ मीटर असून असून आजची पातळी १६.८० मीटर झाली आहे. याप्रमाणेच मोहने बंधाºयाची धोका पातळी दहा मीटर असून आजची पातळी १०.१० मीटर झाली आहे. या बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ं* *