शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आतापर्यंत न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:29 IST

ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात एक हजार ९६.२० मिमी. पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी. नोंद घेतली. आतापर्यंत ५११.८२ मिमी . पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.

ठळक मुद्दे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढलामोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आलेकल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात ही पडत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात तो भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याभरात आतापर्यंत ७३.१३ टक्के पाऊस पडला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणाी साठा वाढला असल्याचे आढळून आले आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणी साठाहोता. तो ओज ६४ टक्के आहे. रात्रभरात ६ टक्के पाणी साठा सर्वाधिक मोठ्या असलेल्या भातसा धरणात वाढला आहे. या प्रमाणेच तानसामध्ये ९२ टक्के साठा असून रात्रभरात तो १२ टक्केने वाढला. या धरणात आज ९९ मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणातही १२ टक्के पाणी साठा वाढून तो ८२.१९ टक्के झाला. बारवीची पाण्याची पातळी सध्या ६६.४४ मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास बारवी भरण्याची शक्यता आहे. बारवी आत २०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात ९५ टक्के पाणी साठा होता.उल्हासनदीला पाणी पुरवठा करणार आंध्रा धरणाची सध्या १६०.९० मीटर पातळी आहे. ४७.४४ टक्के पाणी साठा असलेल्या आंध्रामध्ये देखील रात्रभरात ४ टक्के पाणी साठा वाढला आहे. या धरणात आज ८० मिमी पाऊस पडला. तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रि या होईल. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली,टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहात असल्याने तेथील वाहतूक देखील बंद करावी लागली. संततधार पावसामुळे धरणाचा पाणी साठा वाढत आहे. याच प्रमाणे बदलापूर बंधारा देखील धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्याची धोका पातळी १७ मीटर असून असून आजची पातळी १६.८० मीटर झाली आहे. याप्रमाणेच मोहने बंधाºयाची धोका पातळी दहा मीटर असून आजची पातळी १०.१० मीटर झाली आहे. या बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ं* *