शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आतापर्यंत न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:29 IST

ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात एक हजार ९६.२० मिमी. पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी. नोंद घेतली. आतापर्यंत ५११.८२ मिमी . पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.

ठळक मुद्दे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढलामोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आलेकल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात ही पडत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात तो भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याभरात आतापर्यंत ७३.१३ टक्के पाऊस पडला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणाी साठा वाढला असल्याचे आढळून आले आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणी साठाहोता. तो ओज ६४ टक्के आहे. रात्रभरात ६ टक्के पाणी साठा सर्वाधिक मोठ्या असलेल्या भातसा धरणात वाढला आहे. या प्रमाणेच तानसामध्ये ९२ टक्के साठा असून रात्रभरात तो १२ टक्केने वाढला. या धरणात आज ९९ मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणातही १२ टक्के पाणी साठा वाढून तो ८२.१९ टक्के झाला. बारवीची पाण्याची पातळी सध्या ६६.४४ मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास बारवी भरण्याची शक्यता आहे. बारवी आत २०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात ९५ टक्के पाणी साठा होता.उल्हासनदीला पाणी पुरवठा करणार आंध्रा धरणाची सध्या १६०.९० मीटर पातळी आहे. ४७.४४ टक्के पाणी साठा असलेल्या आंध्रामध्ये देखील रात्रभरात ४ टक्के पाणी साठा वाढला आहे. या धरणात आज ८० मिमी पाऊस पडला. तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रि या होईल. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली,टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहात असल्याने तेथील वाहतूक देखील बंद करावी लागली. संततधार पावसामुळे धरणाचा पाणी साठा वाढत आहे. याच प्रमाणे बदलापूर बंधारा देखील धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्याची धोका पातळी १७ मीटर असून असून आजची पातळी १६.८० मीटर झाली आहे. याप्रमाणेच मोहने बंधाºयाची धोका पातळी दहा मीटर असून आजची पातळी १०.१० मीटर झाली आहे. या बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ं* *