शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

By सदानंद नाईक | Updated: August 6, 2023 18:03 IST

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात.

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने, डॉक्टर, नर्सवर ताण वाढल्याचे चित्र रुग्णालयात आहे. यातूनच रुग्णांची हेडसांड होत असून रुग्णालयात उपलब्ध बेड पेक्षा रुग्णांची संख्या जास्त झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप, सर्दी-खोकला, मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यापूर्वी सरासरी ९५० रुग्ण संख्याची नोंद बाह्यरुग विभागात होत होती. तसेच रुग्णालयात २०० बेडचे असतांना ३०० पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करण्यात आले. अचानक वाढलेल्या रुग्णामुळे डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींची दमछाक होत असून रुग्णांचीही हेडसांड होत असल्याची कबुली डॉ बनसोडे यांनी दिली आहे.

 महापालिका आरोग्य विभाग मात्र व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे सांगत आहे. महापालिका आरोग्य केंद्रात सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्ण त्याकडे फिरकत नाही. महापालिकेने अंटेलिया येथे बांधलेल्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले. मात्र रुग्णालय सुरू करण्याला महापालिकेला अपयश आले असून खरेदी केलेले कोट्यवधीचें साहित्य भंगारात निघाले आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. महापालिकेने वेळीच रुग्णालय सुरू केले असतेतर, आज मध्यवर्ती रुग्णालयात होत असलेली रुग्णांनी हेडसांड झाली नसती. अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या महापालिका रुग्णालय खाजगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव असल्याची टीकाही शहरातून होत असून महापालिका आरोग्य विभागावर सर्वत्र टीका होत आहे. 

महापालिका आरोग्य विभाग नावालाच महापालिकेचे रिजेन्सी अंटेलिया येथे बांधलेले रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती बंद असलेल्या महापालिका रुग्णालयात केली असतीतर, आज रुग्णांना सेवा देता आल्या असत्या. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडीत निघाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर