शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

By सदानंद नाईक | Updated: August 6, 2023 18:03 IST

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात.

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने, डॉक्टर, नर्सवर ताण वाढल्याचे चित्र रुग्णालयात आहे. यातूनच रुग्णांची हेडसांड होत असून रुग्णालयात उपलब्ध बेड पेक्षा रुग्णांची संख्या जास्त झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप, सर्दी-खोकला, मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यापूर्वी सरासरी ९५० रुग्ण संख्याची नोंद बाह्यरुग विभागात होत होती. तसेच रुग्णालयात २०० बेडचे असतांना ३०० पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करण्यात आले. अचानक वाढलेल्या रुग्णामुळे डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींची दमछाक होत असून रुग्णांचीही हेडसांड होत असल्याची कबुली डॉ बनसोडे यांनी दिली आहे.

 महापालिका आरोग्य विभाग मात्र व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे सांगत आहे. महापालिका आरोग्य केंद्रात सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्ण त्याकडे फिरकत नाही. महापालिकेने अंटेलिया येथे बांधलेल्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले. मात्र रुग्णालय सुरू करण्याला महापालिकेला अपयश आले असून खरेदी केलेले कोट्यवधीचें साहित्य भंगारात निघाले आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. महापालिकेने वेळीच रुग्णालय सुरू केले असतेतर, आज मध्यवर्ती रुग्णालयात होत असलेली रुग्णांनी हेडसांड झाली नसती. अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या महापालिका रुग्णालय खाजगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव असल्याची टीकाही शहरातून होत असून महापालिका आरोग्य विभागावर सर्वत्र टीका होत आहे. 

महापालिका आरोग्य विभाग नावालाच महापालिकेचे रिजेन्सी अंटेलिया येथे बांधलेले रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती बंद असलेल्या महापालिका रुग्णालयात केली असतीतर, आज रुग्णांना सेवा देता आल्या असत्या. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडीत निघाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर