शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

By सदानंद नाईक | Updated: August 6, 2023 18:03 IST

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात.

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने, डॉक्टर, नर्सवर ताण वाढल्याचे चित्र रुग्णालयात आहे. यातूनच रुग्णांची हेडसांड होत असून रुग्णालयात उपलब्ध बेड पेक्षा रुग्णांची संख्या जास्त झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ताप, सर्दी-खोकला, मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यापूर्वी सरासरी ९५० रुग्ण संख्याची नोंद बाह्यरुग विभागात होत होती. तसेच रुग्णालयात २०० बेडचे असतांना ३०० पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करण्यात आले. अचानक वाढलेल्या रुग्णामुळे डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींची दमछाक होत असून रुग्णांचीही हेडसांड होत असल्याची कबुली डॉ बनसोडे यांनी दिली आहे.

 महापालिका आरोग्य विभाग मात्र व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे सांगत आहे. महापालिका आरोग्य केंद्रात सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्ण त्याकडे फिरकत नाही. महापालिकेने अंटेलिया येथे बांधलेल्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले. मात्र रुग्णालय सुरू करण्याला महापालिकेला अपयश आले असून खरेदी केलेले कोट्यवधीचें साहित्य भंगारात निघाले आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. महापालिकेने वेळीच रुग्णालय सुरू केले असतेतर, आज मध्यवर्ती रुग्णालयात होत असलेली रुग्णांनी हेडसांड झाली नसती. अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या महापालिका रुग्णालय खाजगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव असल्याची टीकाही शहरातून होत असून महापालिका आरोग्य विभागावर सर्वत्र टीका होत आहे. 

महापालिका आरोग्य विभाग नावालाच महापालिकेचे रिजेन्सी अंटेलिया येथे बांधलेले रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कोरोना काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती बंद असलेल्या महापालिका रुग्णालयात केली असतीतर, आज रुग्णांना सेवा देता आल्या असत्या. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडीत निघाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर