शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६५६ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६५६ रुग्णांची मंगळवारी वाढ झाली असून, ४० रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच ...

ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६५६ रुग्णांची मंगळवारी वाढ झाली असून, ४० रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ११ हजार ६६५ रुग्णांसह मृतांची संख्या आठ हजार ९६३ नोंदली आहे.

ठाणे मनपाच्या परिसरात १३१ रुग्ण आढळले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख २८ हजार १०० झाली. या शहरात पाच बाधित दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ८६५ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात १०२ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ३२ हजार सहा झाली. दिवसभरातील १६ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ५६९ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.

उल्हासनगरला ५२ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला. आता येथील रुग्णसंख्या २० हजार १४५ झाली असून, ४६७ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला दिवसभरात १४ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथील एकूण रुग्ण १० हजार ३९८ झाले असून, मृत्यू ४३४ नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला ११३ रुग्णांसह सहा मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्णसंख्या ४८ हजार ३३६ झाली असून एक हजार २५६ मृतांची नोंद झाली आहे.

अंबरनाथला १४ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. येथील रुग्णसंख्या आता १९ हजार १५५ झाली असून ४०३ मृतांची नोंद झाली आहे. कुळगाव बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली आहे. मात्र एकही मृत्यू नाही. आता येथील २० हजार ४१५ रुग्णांसह २४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १०१ रुग्ण आढळले असून तीन जण दगावले. या परिसरात आतापर्यंत ३५ हजार ६३४ रुग्णांची वाढ होऊन ८५२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.