शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११३७ रुग्णांची वाढ; ५९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण ...

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख पाच हजार ८३७ झाली असून, आतापर्यंत आठ हजार ७०७ मृतांची नोंद करण्यात आली.

ठाणे शहरात नवे २०४ रुग्ण आढळले असून, शहरात आतापर्यंत एक लाख २७ हजार २८६ रुग्ण नोंदले आहेत. आठ मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या एक हजार ८३७ झाली. कल्याण- डोंबिवलीला नवे २७७ रुग्ण आढळून आले असून, २३ मृत्यू झाले. या शहरात आता एक लाख ३१ हजार ३१ बाधित असून, एक हजार ७६८ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरला १९ नवे रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १९ हजार ८८१ बाधित असून, एकूण मृत्यूसंख्या ४७३ नोंदली आहे. भिवंडीला १५ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथे दहा हजार २७४ बाधितांची, तर ४२७ मृतांची नोंद झाली. मीरा भाईंदरला १५२ रुग्ण सापडले असून, आठ मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत ४७ हजार ६९५ बाधितांसह एक हजार २२४ मृतांची नोंद आहे.

अंबरनाथ शहरात १६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, दोन मृत्यू झाले. शहरात आता १९ हजार ४३ बाधितांसह मृतांची संख्या ३९८ झाली आहे. बदलापूरला नवे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २० हजार २२८ असून, एकही मृत्यू नसल्याने एकूण मृत्यूची संख्या २३३ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १५१ रुग्ण सापडले असून, दहा मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत ३३ हजार ५२१ बाधित झाले असून, एकूण मृत्यू ८२२ नोंदले आहेत.

...........

वाचली