शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आसनगाव रेल्वे स्थानकात असुविधा, रेल्वे प्रशासन उदासीन : प्रवासी संघटनांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:04 IST

शहापूर तालुक्यातील जवळजवळ १६५ गावातील प्रवासी आसनगाव रेल्वे स्थानकातून कल्याण, ठाणे, मुंबई येथे नोकरीनिमित्त प्रवास करतात.

आसनगाव : शहापूर तालुक्यातील जवळजवळ १६५ गावातील प्रवासी आसनगाव रेल्वे स्थानकातून कल्याण, ठाणे, मुंबई येथे नोकरीनिमित्त प्रवास करतात. या स्थानकातील दैनंदिन महसुली उत्पन्न ५ लाखांच्या घरात आहे. मात्र, तरीही येथे प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा देखील मिळत नाहीत. स्थानक स्वच्छता राखण्याबाबत रेल्वे प्रशासन कमालीचे उदासीन आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांना या गोष्टी लक्षात आल्या.स्थानकातील पिण्याच्या पाण्याची टाकी नियमितरित्या साफ होत नाही. त्यामुळे यात गढूळ व दूषित पाणी आढळले. प्रवासी ते पित असतात. स्थानकातील शौचालये देखील अस्वच्छ आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी मोडकळीस आलेल्या खुर्च्या ठेवल्या आहेत. हात धुण्यासाठी असलेले बेसिन अस्वच्छ आहे. बेसिनखाली पाण्याचा निचरा करण्याची काही व्यवस्था नसल्याने पाणी साठून राहून मलेरिया तसेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. संपूर्ण फलाट घाणीने बकाल झालेला आहे. स्थानकाची ही दयनीय परिस्थिती पाहून संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी याबाबत ताबडतोब सिनियर डिसीएम नरेंद्र पनवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी देखील याची तातडीने दखल घेत याकडे ताबडतोब लक्ष दिले जाईल, असे सांगितले.रेल्वे प्रवाशांकडून भाडे वसूल करते, मात्र, त्यांना प्राथमिक सुविधा, रुंद ब्रीज, स्वच्छ फलाट, शौचालय सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्यासाठी चांगल्या खुर्च्या या किमान सुविधा देण्यातही चालढकल करते. या अन्यायकारक परिस्थितीला रेल्वे अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल