शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

खर्चावर आयकर अधिकाऱ्यांचा ‘वॉच’

By admin | Updated: February 1, 2017 03:32 IST

राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चावर, हिशोबावर नियमानुसार खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

ठाणे : राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चावर, हिशोबावर नियमानुसार खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. विभागाचे अधिकारी सध्या ठाण्यातील विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांची वारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ते विद्यमान नगरसेवकांचा इतिहास, प्रभागात सुरु असलेली कामे, विविध कार्यक्रम त्यावर होणारा खर्च अशी माहिती गोळा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या उमेदवारांनी आतापासूनच खर्चावर आळा घातल्याचे दिसत आहे. परंतु, अशा प्रकारे माहिती गोळा केली जात असल्याने जे उमेदवार केवळ आर्थिक ताकदीवरच निवडून येण्याची भाषा करतात, त्यांना मात्र यामुळे चांगलाच अंकुश बसण्याची चिन्हे आहेत.मागील आठवड्यात राज्याचे निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आयकर विभागाचे अधिकारी नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत ६ आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत ५ आयकर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आली आहे. तर ठाणे महापालिकेतील प्रत्येक उमेदवाला ४ लाखांची आणि उल्हासनगर महापालिकेतील प्रत्येक उमेदवाराला ३ लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे. निवडणुकीत झालेला खर्च, निवडणुकीनंतर एकूण खर्चाचा हिशोब आदीची माहिती उमेदवाराला द्यावी लागणार आहे. असे असले तरी आता या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाण्याच्या महत्त्वाच्या आणि ज्या प्रभागातून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. अशा प्रभागातून अतिशय छुप्या पद्धतीने विद्यमान नगरसेवकांची माहिती घेण्याची माहिती सुरु केली आहे. या भागातून सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमांची, त्या कार्यक्रमांचे नियोजन कोण करीत आहे, त्यावर होणारा खर्च, तो कोणाच्या माध्यमातून केला जात आहे, आदी विषयांची माहिती घेतली जात आहे. विशेष म्हणजे साधा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जरी झाला तरी त्याचा लेखाजोखा गोळा करण्याचे काम सुरू आहे. - अधिकाऱ्यांच्या या कडक तपासणीमुळे इच्छुकांच्या पोटात मात्र गोळा आला आहे. प्रचार करायचा कसा, मतदात्यापर्यंत जायचे कसे आदींसह अनेक प्रश्न त्यांना सतावू लागले आहेत. खर्च करायचा झाला तर तो लगेच या अधिकाऱ्यांच्या रडारवर येणार असल्याने हा खर्च कोणत्या पद्धतीने करायचा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी काही पर्याय सुचतात का, याचाही विचार सुरू आहे.