शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

घोडबंदरच्या ६८ प्रकल्पांना ओसी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:46 IST

पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, सीसी आणि ओसीदेखील न देण्याचे आदेश आहेत. त्याबाबतची सुनावणी झाली असून यामध्ये घोडबंदर भागात मागील पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली आणि सध्या या बांधकामांना पाणीपुरवठा सुरळीत होत आहे का, याची माहिती तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि पाणीपुरवठा विभाग याबाबत एक संयुक्त मोहीम हाती घेणार असून पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली, याचा शोध सुरू केला आहे. परंतु, आतापर्यंत नव्याने सुरू असलेल्या ६८ प्रकल्पांना ओसी दिली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.घोडबंदर भागात रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचा विचार न करताच नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळेच आता नव्या बांधकामांना परवानगी नकोच, असे सांगून उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदरमधील बांधकामांना कमेन्समेंट सर्टिफिकेट व भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले होते. दुसरीकडे ओसीदेखील न देण्याचे निर्देश दिल्याने त्याचा फटका येथील बांधकाम व्यावसायिकांना बसणार आहे. या बांधकामांना न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत ओसी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच या इमारतींना ओसी नाही म्हणून पाणी न देण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानंतरच्या सुनावणीत २०२५ सालापर्यंत वाढणाºया लोकसंख्येसाठी पाण्याचे नियोजन केले आहे, असेप्रतिज्ञापत्र पालिकेने कोर्टापुढे सादर केले. मात्र, त्यानंतरही अद्याप न्यायालयाने हे बंदी आदेश उठवले नाहीत. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.याची सुनावणी २८ जुलैला झाली असून न्यायालयाने पुढील तीन आठवड्यांपर्यंत स्थगिती देताना पालिकेने या भागात मागील पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली आहे आणि त्या बांधकामांना सुस्थितीत पाणीपुरवठा होतो आहे का, याची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पालिकेच्या शहर विकास आणि पाणीपुरवठा विभागाने याबाबत आता शोध मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.