शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गो शाळेत तयार होताहेत शेणापासून धूप, होळीसाठी काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST

अंबरनाथ : आपल्या गोशाळेतून पर्यावरण रक्षणासाठी अजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही रसायनांचा वापर न ...

अंबरनाथ : आपल्या गोशाळेतून पर्यावरण रक्षणासाठी अजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही रसायनांचा वापर न करता सुगंधी धूप आणि होळीसाठी काड्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात अंत्यसंस्कारासाठीही शेणाच्या काड्यांचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही दसपुते यांनी सांगितले.

आपली बड्या रकमेची नोकरी सोडून अंबरनाथकर असलेले दसपुते यांनी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकनगरीजवळील फार्मिंग सोसायटीमध्ये त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली आणि सुरुवातीला चार गाई घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे साधारण २० ते २५ देशी गाई आहेत. आपल्या उपजीविकेसाठी दूध व्यवसाय तर आहेच, मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गोशाळेत सुगंधी धूप, होळीसाठी काड्या तसेच भविष्यात अंत्यसंस्कारासाठीदेखील लाकडांचा वापर न करता शेणापासून तयार केलेल्या काड्यांचा वापर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दीड वर्षांपूर्वी गोठा भाड्याने घेऊन दसपुते यांनी हा व्यवसाय सुरू केला. सध्या या गोशाळेतून अंबरनाथ, उल्हासनगर, आणि बदलापूर परिसरातील ग्राहकांना ‘अ-२’दर्जाच्या दुधाचे वितरण होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त शेणखत, शेणाच्या लाद्या (शेणी), गोमूत्र हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपयुक्त घटकही या गोशाळेत तयार होतात.

‘अग्निहोत्र’ करण्यासाठी सुकलेल्या शेणाच्या वड्या उपयुक्त ठरतात. ते सकाळ-संध्याकाळ जाळल्याने परिसरातील वातावरण शुद्ध होते. गाईच्या शेणात ३५ टक्के ऑक्सिजन असतो. ते वाळवून त्याच्या गोवऱ्या केल्यावर त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ४५ टक्के इतके होते. त्या जाळल्यावर तयार होणाऱ्या धुरावाटे ५५ ते ८० टक्के ऑक्सिजन हवेत सोडला जातो, अशी माहिती दसपुते यांनी दिली.

-------------------------------------------

मक्याची लागवड करून हिरवा चारा

या गोशाळेत घरात जाळण्यासाठी विविध आकाराच्या शेणकांडी, शेणाच्या वड्या तसेच नैसर्गिक कीटकनाशक जीवामृतही बनविले जाते. शेणखतही गरज आणि उपलब्धतेनुसार लोकांना दिले जाते. तबेल्यातच मक्याची लागवड करून गाईंसाठी हिरवा ताजा चारा मिळविला जातो. याशिवाय सकाळ-संध्याकाळ गाईंना सकस आहार दिला जातो.