शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गो शाळेत तयार होताहेत शेणापासून धूप, होळीसाठी काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST

अंबरनाथ : आपल्या गोशाळेतून पर्यावरण रक्षणासाठी अजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही रसायनांचा वापर न ...

अंबरनाथ : आपल्या गोशाळेतून पर्यावरण रक्षणासाठी अजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही रसायनांचा वापर न करता सुगंधी धूप आणि होळीसाठी काड्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात अंत्यसंस्कारासाठीही शेणाच्या काड्यांचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही दसपुते यांनी सांगितले.

आपली बड्या रकमेची नोकरी सोडून अंबरनाथकर असलेले दसपुते यांनी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकनगरीजवळील फार्मिंग सोसायटीमध्ये त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली आणि सुरुवातीला चार गाई घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे साधारण २० ते २५ देशी गाई आहेत. आपल्या उपजीविकेसाठी दूध व्यवसाय तर आहेच, मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गोशाळेत सुगंधी धूप, होळीसाठी काड्या तसेच भविष्यात अंत्यसंस्कारासाठीदेखील लाकडांचा वापर न करता शेणापासून तयार केलेल्या काड्यांचा वापर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दीड वर्षांपूर्वी गोठा भाड्याने घेऊन दसपुते यांनी हा व्यवसाय सुरू केला. सध्या या गोशाळेतून अंबरनाथ, उल्हासनगर, आणि बदलापूर परिसरातील ग्राहकांना ‘अ-२’दर्जाच्या दुधाचे वितरण होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त शेणखत, शेणाच्या लाद्या (शेणी), गोमूत्र हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपयुक्त घटकही या गोशाळेत तयार होतात.

‘अग्निहोत्र’ करण्यासाठी सुकलेल्या शेणाच्या वड्या उपयुक्त ठरतात. ते सकाळ-संध्याकाळ जाळल्याने परिसरातील वातावरण शुद्ध होते. गाईच्या शेणात ३५ टक्के ऑक्सिजन असतो. ते वाळवून त्याच्या गोवऱ्या केल्यावर त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ४५ टक्के इतके होते. त्या जाळल्यावर तयार होणाऱ्या धुरावाटे ५५ ते ८० टक्के ऑक्सिजन हवेत सोडला जातो, अशी माहिती दसपुते यांनी दिली.

-------------------------------------------

मक्याची लागवड करून हिरवा चारा

या गोशाळेत घरात जाळण्यासाठी विविध आकाराच्या शेणकांडी, शेणाच्या वड्या तसेच नैसर्गिक कीटकनाशक जीवामृतही बनविले जाते. शेणखतही गरज आणि उपलब्धतेनुसार लोकांना दिले जाते. तबेल्यातच मक्याची लागवड करून गाईंसाठी हिरवा ताजा चारा मिळविला जातो. याशिवाय सकाळ-संध्याकाळ गाईंना सकस आहार दिला जातो.