शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

By सदानंद नाईक | Updated: July 20, 2022 18:35 IST

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून सन २०११ च्या जनगणेनेच्या तुलनेत तब्बल सव्वा लाख मतदार संख्या कमी झाल्याचे उघड झाले. तर गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने, मतदार स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. उल्हासनगर महापालिकेने सन २०११ च्या जनगणनानुसार उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या यादीनुसार शहरातील मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार होती. मात्र, दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाला जीन्स कारखान्याना जबाबदार धरून जीन्स उद्योगावर कारवाई केल्यावर, जीन्स उद्योगासह त्या संबंधीत कारखाने व त्यामध्ये कामगार तसेच सिंधी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्याचा परिणाम मतदार यादीवर झाला आहे. त्यामुळे पाच लाखांवरून मतदारांची संख्या तीन लाख ७३ हजार ७०२ वर आली आहे. त्यात दोन लाख दोन हजार ५४७ पुरुष, एक लाख ७१ हजार ८० महिला आणि ७५ तृतीयपंथी यांचा समावेश आहे.

गेल्यावेळी महापालिकेत एकून २० प्रभाग होते. त्या मधून ७८ नगरसेवक निवडून आले. यावेळी तीन सदस्यीय २९ तर दोन सदस्यीय १ असे एकून ३० प्रभागातून ८९ नगरसेवक निवडून येणार आहे. गेल्या वेळी पेक्षा ११ नगरसेवकाच्या संख्येत वाढ होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे यांनी दिली आहे. 

शहर सिंधी समाज बहुल असल्याचे बोलले जाते. मात्र सिंधी समाजाची मतदार संख्या झपाट्याने कमी होत असल्याने, मराठी व उत्तर भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

सिंधी समाजाने व्यक्त केली चिंताउल्हासनगर म्हणजे सिंधी समाज बहुल संख्या असलेले शहर अशी ओळख आहे. मात्र ही ओळख इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधी समाज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व ठाणे आदी ठिकाणी मोठया प्रमाणात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मतदार यादीवरून नजर फिरविल्यास सिंधी समाजाचे मतदार कमी झाल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Votingमतदानulhasnagarउल्हासनगर