शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

By सदानंद नाईक | Updated: July 20, 2022 18:35 IST

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून सन २०११ च्या जनगणेनेच्या तुलनेत तब्बल सव्वा लाख मतदार संख्या कमी झाल्याचे उघड झाले. तर गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने, मतदार स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. उल्हासनगर महापालिकेने सन २०११ च्या जनगणनानुसार उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या यादीनुसार शहरातील मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार होती. मात्र, दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाला जीन्स कारखान्याना जबाबदार धरून जीन्स उद्योगावर कारवाई केल्यावर, जीन्स उद्योगासह त्या संबंधीत कारखाने व त्यामध्ये कामगार तसेच सिंधी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्याचा परिणाम मतदार यादीवर झाला आहे. त्यामुळे पाच लाखांवरून मतदारांची संख्या तीन लाख ७३ हजार ७०२ वर आली आहे. त्यात दोन लाख दोन हजार ५४७ पुरुष, एक लाख ७१ हजार ८० महिला आणि ७५ तृतीयपंथी यांचा समावेश आहे.

गेल्यावेळी महापालिकेत एकून २० प्रभाग होते. त्या मधून ७८ नगरसेवक निवडून आले. यावेळी तीन सदस्यीय २९ तर दोन सदस्यीय १ असे एकून ३० प्रभागातून ८९ नगरसेवक निवडून येणार आहे. गेल्या वेळी पेक्षा ११ नगरसेवकाच्या संख्येत वाढ होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे यांनी दिली आहे. 

शहर सिंधी समाज बहुल असल्याचे बोलले जाते. मात्र सिंधी समाजाची मतदार संख्या झपाट्याने कमी होत असल्याने, मराठी व उत्तर भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

सिंधी समाजाने व्यक्त केली चिंताउल्हासनगर म्हणजे सिंधी समाज बहुल संख्या असलेले शहर अशी ओळख आहे. मात्र ही ओळख इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधी समाज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व ठाणे आदी ठिकाणी मोठया प्रमाणात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मतदार यादीवरून नजर फिरविल्यास सिंधी समाजाचे मतदार कमी झाल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Votingमतदानulhasnagarउल्हासनगर