शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

उल्हासनगरात रस्त्याच्या भूमिपूजनावरून कलानी व रिपाई आमने सामने; भालेराव व कलानीकडून एकाच रस्त्याचे दोनवेळा झाले भूमिपूजन

By सदानंद नाईक | Updated: October 16, 2022 19:40 IST

उल्हासनगरात रस्त्याच्या भूमिपूजनावरून कलानी व रिपाई आमने सामने आले आहेत. 

उल्हासनगर : शहरातील ३ कोटीच्या निधीतील रामदेवनगर ते म्हारळ नाका रस्त्याचे भूमिपूजन रविवारी पप्पु कलानी यांच्या पाठोपाठ रिपाईचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते झाले. रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी कलानी व रिपाई आमने सामने आले असून भालेराव यांनी उपमहापौर पदावर असतांना रस्त्याला मंजुरी दिल्याची माहिती दिली.

उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक होणार असून यापूर्वी रस्ता बांधणीला मंजुरी मिळाल्या आहेत. रस्त्याच्या भूमिपूजनावरून राजकीय पक्ष श्रेय घेण्यासाठी आमने सामने आल्याचे प्रकार घडत आहेत. रविवारी कॅम्प नं-१ मधील रामदेवनगर ते म्हारळ नाका दरम्यानच्या रस्त्याला महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव असतांना मंजुरी देण्यात आली. ३ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्यां रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार पप्पु कलानी यांच्या हस्ते झाले. प्रभाग क्रं-७ मधून निवडून आलेल्या शुभांगी निकम यांच्या प्रयत्नाने रस्त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती कमलेश निकम यांनी यावेळी दिली. 

उपमहापौर पदाच्या काळात जनरल निधीतून रामदेवनगर ते म्हारळ नाका रस्ता बांधणीला मंजुरी मिळाल्याची माहिती माजी उपमहापौर व रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी दिली. तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन केले. रस्त्याच्या कामाचे कोणी श्रेय घेवू नये. प्रभागात विकास कामे करण्यास वाव असून त्या विकास कामाला आयुक्तांकडून मंजूरी आणावी. असा टोला पप्पु कलानी यांच्या समर्थकांना भालेराव यांनी लावला. माझ्या उपमहापौर व नगरसेवक निधीतून झालेल्या कामाचा दर्जा तपासावा व इतरांनी केलेल्या कामाचा दर्जा तपासावा. असे सूचक वक्तव्य भालेराव यांनी करून रस्त्याच्या दर्जा तपासण्याचा चेंडू आयुक्त अजीज शेख यांच्या कोर्टात टाकला. एकाच रस्त्याचे भूमिपूजन पप्पु कलानी यांच्या हस्ते व त्यानंतर रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते झाल्याने, निवडणुकी पूर्वीच कलानी व भालेराव आमने सामने आल्याचे चित्र शहरात आहे. 

शासनाचा दलित वस्तीचा निधी पडून? महापालिका अंतर्गत येणाऱ्या दलित वस्तीतील विकास कामे होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी पडून असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दलीत वस्तीतील कामे व निधी महापालिका आयुक्तांनी प्रसिद्ध करून पारदर्शकपणा दाखवावा. असे आवाहन माजी उपमहापौर भालेराव यांनी केले. तसे झाल्यास मोठा भष्ट्राचार उघड होणार असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर