शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 18:06 IST

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली.

उल्हासनगर : शहरातील कुर्ला कॅम्प परिसरात भुयारी गटार पाईप टाकण्याच्या वेळी पाण्याची जलवाहिनी फुटल्याने, काही नागरिकांच्या घरी पाणी घुसले. यांप्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.

 उल्हासनगरात भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्यामध्ये अनियमितता असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळा जलकुंभ परिसरात रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकण्याचे काम बुधवारी रात्री सुरू होते. त्यावेळी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली गेले. तसेच शेजारील काहीं घरात पाणी घुसल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली. स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनी शहरातील भुयारी गटारी खोदताना कोणतीही सुरक्षा न घेता रस्ते खोदत जात असल्याने, नागरिकांची गैरसोय होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली. तर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी भुयारी गटार योजनेबाबत नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून रस्ते धुळीने माखल्याने, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले.

 महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. मात्र दोन दिवस पाणी बंद राहिल्याने, नागरिकांचे हाल झाले. भुयारी गटार खोदताना अनेक वेळा जलवाहिन्या तुटण्यात आल्या असून गटारीचे काम अटीशर्तीचें उल्लंघन करून होत असल्याची टीका शहरातून होत आहे. भुयारी गटारीचे २९ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख बुडगे यांनी करून ठेकेदाराला १५ कोटी पेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती दिली. 

खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती नाही शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याची परिस्थिती निर्माण झाली.

 *ठेकेदाराला विचारला जाब...आयुक्त अजीज शेख शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून रस्ते खोदतांना पाण्याच्या जलवाहिनी तुटल्या जात आहे. ठेकेदाराकडून झालेली नुकसान भरपाई केली जात असून त्यांना तसे आदेश दिले आहे.