शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उल्हासनगरात १९७५ साली दहावी पास झालेले ६० विद्यार्था ५० वर्षानंतर आले एकत्र!

By सदानंद नाईक | Updated: April 29, 2024 19:19 IST

सर्वांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देत धमाल-मस्ती केली

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेले वर्गमित्र रविवारी मयूर हॉटेल येथे एकत्र आले. सर्वांनी शाळेच्या गोष्टीला उजाळा देऊन धमाल केली. उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेल्या वर्गमित्रांनी विविध क्षेत्रात प्रगती केली. कधीकाळी भेटल्यानंतर हाय हॅलो करणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी आ. आयलानी यांनी पुढाकार घेतला.

वर्ग मित्रांचे पत्ते शोधल्यानंतर त्यांना रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. तब्बल ५० वर्षानंतर ५५ ते ६० वर्ग मित्र एकत्र आल्यानंतर जुन्या गोष्टींना उजाडा देऊन धमाल केली. आयलानी हे १९७५ साली एसईएस शाळेतून एसएससी पास झाले. आयलानी यांनी नगरसेवक, उपमहापौर, महापौर, आमदार आदी महत्वाची पदे उपभोगली असून लोकसभा निवडणुकीत शहरातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रसिद्ध उधोगपती अनु मनमानी, मुकेश किमतांनी, गोवा फ्रूडचे अमर बसतांनी आदी जण यावेळी एकत्र आले होते.

एसएससी पास झाल्यानंतर तब्बल ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांचे सुखदुःखांची विचारणा करून यापुढेही असेच एकत्र येण्याचे वचन दिले. बहुतांश मित्रांनी विविध क्षेत्रात आघाडीवर असून अनेकांचे मुले डॉक्टर, इंजिनिअर, सीए झाले आहेत. तर अनेक जण सरकारी नोकरी मध्ये आहेत. तसेच ज्यां मित्रांना मदतीची गरज आहे. त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली. १९७५ साली दहावी पास झालेल्या मित्रा पैकी अनेकजण देवाला आवडल्याचेही आयलानी म्हणाले. ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणीला उजाडा देऊन धमाल केल्यानंतर, जड मनाने पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकाला निरोप देण्यात आला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर