शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उल्हासनगरात १९७५ साली दहावी पास झालेले ६० विद्यार्था ५० वर्षानंतर आले एकत्र!

By सदानंद नाईक | Updated: April 29, 2024 19:19 IST

सर्वांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देत धमाल-मस्ती केली

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेले वर्गमित्र रविवारी मयूर हॉटेल येथे एकत्र आले. सर्वांनी शाळेच्या गोष्टीला उजाळा देऊन धमाल केली. उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेल्या वर्गमित्रांनी विविध क्षेत्रात प्रगती केली. कधीकाळी भेटल्यानंतर हाय हॅलो करणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी आ. आयलानी यांनी पुढाकार घेतला.

वर्ग मित्रांचे पत्ते शोधल्यानंतर त्यांना रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. तब्बल ५० वर्षानंतर ५५ ते ६० वर्ग मित्र एकत्र आल्यानंतर जुन्या गोष्टींना उजाडा देऊन धमाल केली. आयलानी हे १९७५ साली एसईएस शाळेतून एसएससी पास झाले. आयलानी यांनी नगरसेवक, उपमहापौर, महापौर, आमदार आदी महत्वाची पदे उपभोगली असून लोकसभा निवडणुकीत शहरातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रसिद्ध उधोगपती अनु मनमानी, मुकेश किमतांनी, गोवा फ्रूडचे अमर बसतांनी आदी जण यावेळी एकत्र आले होते.

एसएससी पास झाल्यानंतर तब्बल ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांचे सुखदुःखांची विचारणा करून यापुढेही असेच एकत्र येण्याचे वचन दिले. बहुतांश मित्रांनी विविध क्षेत्रात आघाडीवर असून अनेकांचे मुले डॉक्टर, इंजिनिअर, सीए झाले आहेत. तर अनेक जण सरकारी नोकरी मध्ये आहेत. तसेच ज्यां मित्रांना मदतीची गरज आहे. त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली. १९७५ साली दहावी पास झालेल्या मित्रा पैकी अनेकजण देवाला आवडल्याचेही आयलानी म्हणाले. ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणीला उजाडा देऊन धमाल केल्यानंतर, जड मनाने पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकाला निरोप देण्यात आला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर