शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकातील ५ जणांवर खंडणीचा गुन्ह्यानंतर निलंबनाची कारवाई

By सदानंद नाईक | Updated: November 10, 2024 17:42 IST

यामध्ये दोन पोलिसांचा समावेश, बडतर्फेची होणार कारवाई, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे संकेत

सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगर आचारसंहिता भरारी पथकाने चेक पोस्टच्या तपासणीत जप्त केलेल्या रक्कमच्या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता, ८५ हजाराची अपरातपर केल्याचा प्रकार उघड झाला. तब्बल १३ दिवसांनी पथकाच्या ५ कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्यावर बडतर्फेची कारवाईचे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.

 उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता पथक क्रं-६ च्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे फुल उत्पादक व्यापारी बबन आमले व त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून अहमदनगर व पुणे येथील शेतकऱ्यांना फुल उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकी जवळ त्यांची गाडी अडवून तपासणी केली. तपासणीत त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम सापडली. यानंतर पथकप्रमुखांनी आमले आणि शिंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविल्यावर, त्यांनी पैश्याच्या पावत्या दाखवून पैसे वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्यांनी जप्त केलेल्या रक्कमे पैकी ८५ हजार रुपये कोणतीही कारवाई न करता उकळण्यात आले. याप्रकरणी आमले व शिंदे यांनी तक्रार करूनही सदर प्रकार उघडकीस यायला १३ दिवस लागले. 

उल्हासनगर मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद व पोलीस अधिकाऱ्यांकडे मीडियाच्या माध्यमानी विचारणा केल्यानंतर, कारवाई सुरू झाली. अखेर उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि विधानसभेचे आचारसंहिता पथक प्रमुख सुनिल लोंढे यांच्या फिर्यादीवरून पथकातील पाच जणांविरुद्ध खंडणी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले. ५ पैकी ३ कर्मचारी महापालिकेचे असून २ कर्मचारी पोलीस आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी पथकातील दोषी पाचही कर्मचाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले. 

निवडणूक आचारसंहिता पाथकाने केलेल्या प्रत्येक कारवाईचे तपासणीचे चित्रीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले नसून पोलिसांनी या कृत्यावर पडदा टाकला असल्याचे उघड झाले. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांच्यावर बडतर्फ कारवाई योग्य असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे.