शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

उल्हासनगर महापालिकेत शेवटच्या स्थायी सभेत कोट्यवधींच्या कामाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 17:05 IST

कोणार्क कंपनीला ठेका देण्यावरून नागरिकांत प्रचंड असंतोष असलातरी, शेवटच्या स्थायी समितीसभेत सर्व पक्षीय समिती सदस्य सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका स्थायी समितीची शेवटची सभा ३० मार्च रोजी होणार असून सभेत कोट्यवधीच्या कामाला सर्व संमतीने मंजुरी मिळणार आहे. कचरा उचलण्याचा ठेका पुन्हा ८ वर्षासाठी कोणार्क कंपनीला देण्याचा निर्णय झाला असून अटी व शर्ती ठेकेदाराच्या बाजूने करण्यात आल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.

 उल्हासनगर महापालिकेची मुदत ४ एप्रिल रोजी संपल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. तर ३० मार्च रोजी स्थायी समितीची मुदत संपणार असल्याने, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी शेवटची समिती सभा ३० तारखेला बोलाविली आहे. सभेत अनेक कामाचे प्रस्ताव असलेतरी सर्वाधिक चर्चा कोणार्क कंपनीला कचऱ्याचा ठेका देण्यावरून आहे. शहरात कचऱ्याचे साम्राज्य, महापालिका अटी व शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन, कंपनी विषयी नागरिकांत प्रचंड असंतोष असतांना कचरा उचलण्याचा ठेका पुन्हा कोणार्क कंपनीला देण्यात येत आहे. यामध्ये प्रचंड आर्थिक देवाणघेवाण झाल्याची टीका होता आहे. ८ वर्षासाठी ठेका देण्यात येणार असून दिवसाला ८ लाख २२ हजार, महिन्याला २ कोटी ४७ लाख तर वर्षाला ३० कोटी ८० लाख रुपये खर्च येणार आहे. 

कोणार्क कंपनीला ठेका देण्यावरून नागरिकांत प्रचंड असंतोष असलातरी, शेवटच्या स्थायी समितीसभेत सर्व पक्षीय समिती सदस्य सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. याच बरोबर खेमानी नाला येथे विधुत यंत्रणा बसविण्यासाठी ३७ लाख ३४ हजार, हवा प्रदूषण मशीन बसविण्यासाठी ९९ लाख, खेमानी चौक ते आंबेडकर रस्त्यासाठी २ कोटी ७७ लाख, मच्छी मार्केट ते सोनार गल्ली रस्त्यांसाठी २ कोटी तसेच हिरा मॅरेज रस्त्यासाठी ३ कोटी आदी प्रस्तावाला मंजुरी ३० मार्चच्या शेवटच्या स्थायी समिती सभेत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असताना दुसरीकडे स्थायी समिती सभेने ठेकेदार, समिती सदस्य व अधिकारी मालामाल होणार असल्याची टीका शहरातून होत आहे. 

महासभा व स्थायी समिती सभेचा धडाका 

महापालिकेची मुदत ४ एप्रिलला तर स्थायी समितीची मुदत ३० मार्च रोजी संपत आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात महासभा व स्थायी समिती सभेचा धडाका उडाला आहे. दोन्ही सभेत अनेक वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आले असून यासभेतील मंजूर झालेल्या विषयाची शहरहितासाठी चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर