शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

ठाणे: पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; मुंबई-नाशिक महामार्गावर फटका, खड्डयांचीही भर

By जितेंद्र कालेकर | Updated: September 16, 2022 21:41 IST

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हाच प्रकार घोडबंदर मार्गावरही असल्यामुळे ठाणे ते कोपरी आणि ठाणे ते घोडबंदर तसेच  कशेळी आणि भिवंडीपर्यंतच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वाहतूकीचा वेग मंदावला होता.

खारेगाव ब्रिजवरील खड्डे आणि कशेळीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच रस्त्यांवरील खड्डयांमुळे चालकांची मोठी कसरत होत होती. बाळकूम ते कापूरबावडी आणि कापूरबावडी नाका ते कशेळी या मार्गावर तर खडयांची संख्या वाढल्यामुळे वाहन चालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. बाळकूम ते माजीवडा आणि माजीवडा ते तीन हात नाका या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२ या दरम्यान तसेच सायंकाळी ५  ते रात्री ८ या दरम्यान मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा होत्या. अनेक ठिकाणी अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक तासांहून अधिक कालावधी लागत होता. खारेगाव ब्रिजवरील खड्डयांमुळे मुंब्र आणि कल्याणकडे जाणारी वाहतूकही खोळंबली होती. तर कशेळीकडे जाणाºया मार्गावरही खड्डे आणि पाणी भरल्यामुळे भिवंडीकडे जाणारी वाहतूक कूर्म गतीने सुरु होती. 

दरम्यान, कोपरी पूलावरील बहुतांश खड्डे बुजविण्यात आल्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना तुलनेने तितका त्रास झाला नाही. परंतू, मुंबई नाशिक मार्गावरील कोंडीमुळे शहरांतर्गत मार्गांवरील कॅडबरी ते वर्तकनगर, खोपट ते टेंभी नाका अशी कोंडी झाली होती. तर शहरातील वंदना सिनेमा आणि गजानन महाराज चौक ते राम मारुती रस्त्यावरही मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे चालकांची दुपारच्या वेळीही मोठी कसरत झाली.  अशी झाली कोंडी-

शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी ४ नंतरही या मार्गांवर वाहतूक कोंडी असल्याचे चित्र होते.

ठाणे शहरातून कशेळीकडे जाणाऱ्या मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान मोठया वाहनांची वाहतूक थांबविली होती. मात्र, तरीही खड्डे आणि पाण्यामुळे वाहतूकीला खोळंबा झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची जादा कुमक तैनात केली होती. - गणेश गावडे, प्रभारी पोलीस उपायुक्त, नियंत्रण शाखा, ठाणे.

टॅग्स :thaneठाणे