शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर

By अजित मांडके | Updated: May 25, 2024 17:00 IST

घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

अजित मांडके, ठाणे : घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात शनिवारी सकाळी देखील येथील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. वाहन चालकांना येथून ये-जा करतांना, पाच मिनिटांच्या कालावधीसाठी पाऊण ते एक तासांचा कालावधी जात होता. बोरिवली कडे जाणाºया तसेच ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्ता शुक्रवार २४ मे पासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामूळे शुक्रवार २४ मे ते ७ जून पर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील महत्वाचा आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे केले जात आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला होता. 

घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले होते. परंतु या कामामुळे घोडबंदर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्याकरिता वाहनचालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. विशेष म्हणजे या कामामुळे बोरिवली कडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले. या वाहतूक कोंडीचा ठाणे आणि बोरिवली येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.

या भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक विभाग, एमबीव्हीव्ही आणि एचएसपी यांच्या माध्यमातून वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सकाळच्या सत्रात फाऊंटनमार्गे अवजड वाहने येतांना अधिक प्रमाणात दिसून आले. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ती सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची दमछाक झाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी