शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर

By अजित मांडके | Updated: May 25, 2024 17:00 IST

घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

अजित मांडके, ठाणे : घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात शनिवारी सकाळी देखील येथील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. वाहन चालकांना येथून ये-जा करतांना, पाच मिनिटांच्या कालावधीसाठी पाऊण ते एक तासांचा कालावधी जात होता. बोरिवली कडे जाणाºया तसेच ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्ता शुक्रवार २४ मे पासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामूळे शुक्रवार २४ मे ते ७ जून पर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील महत्वाचा आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे केले जात आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला होता. 

घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले होते. परंतु या कामामुळे घोडबंदर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्याकरिता वाहनचालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. विशेष म्हणजे या कामामुळे बोरिवली कडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले. या वाहतूक कोंडीचा ठाणे आणि बोरिवली येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.

या भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक विभाग, एमबीव्हीव्ही आणि एचएसपी यांच्या माध्यमातून वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सकाळच्या सत्रात फाऊंटनमार्गे अवजड वाहने येतांना अधिक प्रमाणात दिसून आले. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ती सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची दमछाक झाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी