शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर

By अजित मांडके | Updated: May 25, 2024 17:00 IST

घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

अजित मांडके, ठाणे : घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात शनिवारी सकाळी देखील येथील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. वाहन चालकांना येथून ये-जा करतांना, पाच मिनिटांच्या कालावधीसाठी पाऊण ते एक तासांचा कालावधी जात होता. बोरिवली कडे जाणाºया तसेच ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्ता शुक्रवार २४ मे पासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामूळे शुक्रवार २४ मे ते ७ जून पर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील महत्वाचा आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे केले जात आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला होता. 

घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले होते. परंतु या कामामुळे घोडबंदर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्याकरिता वाहनचालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. विशेष म्हणजे या कामामुळे बोरिवली कडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले. या वाहतूक कोंडीचा ठाणे आणि बोरिवली येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.

या भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक विभाग, एमबीव्हीव्ही आणि एचएसपी यांच्या माध्यमातून वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सकाळच्या सत्रात फाऊंटनमार्गे अवजड वाहने येतांना अधिक प्रमाणात दिसून आले. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ती सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची दमछाक झाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी