शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात : विजय वडेट्टीवार

By अजित मांडके | Updated: August 17, 2023 12:45 IST

शहर सौंदरीकरणावर करोड्यांचा खर्च केला जात आहे, मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत.

ठाणे : शहर सौंदरीकरणावर करोड्यांचा खर्च केला जात आहे, मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र इकडे लोकांचे जीव जात असताना त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत असल्याचा आरोप राज्याची विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात जे खुनी त्यांच्याच हाती चौकशी समिती दिली आहे त्यामुळे चौकशी काय होणार हे यातून दिसत आहे या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

कळवा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा आहे या ठिकाणी डॉक्टर नर्सेस यांची कमतरता आहे तसेच सुविधांचा देखील अभाव आहे त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेला चालवायला येत नसेल तर त्यांनी शासनाकडे द्यावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे मात्र राज्यात सत्तेची साठमारी सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. केवळ आपल्या मर्जीतल्या लोकांना ठेका मेळावा यासाठीच कळवा रुग्णालय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. कळवा रुग्णालयात स्वच्छता न करता केवळ बिले काढले जात आहेत. रुग्णालयात जुनीच यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव असल्याचाही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाणेकरांना ग्लोबल हॉस्पिटल ची स्वप्न दाखवतात मात्र कळवा हॉस्पिटल कडे पाहिल्यास ते येथील रुग्णांच्या आरोग्याशी खेळतात की काय असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याभोळ झाला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या 50% जागा रिक्त आहेत दुसरीकडे कळवा रुग्णालय ते अनेक पद रिक्त आहेत असं असताना मग राज्यातील गडचिरोली असेल किंवा इतर ग्रामीण भागात बाग असतील त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करून काय होणार असा सवालही त्यांनी केला. कळवा हॉस्पिटलमध्ये आयसी मध्ये रुग्ण गंभीर अवस्थेत असताना त्या ठिकाणी सीनियर डॉक्टर न जाता जुनियर डॉक्टर तपासणीसाठी जात आहेत हे गंभीर असल्याचेही ते म्हणाले. 

महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर या घटनेत मृत पावलेल्यांना किमान दहा लाखांची मदत तात्काळ दिली जावी अशी मागणी ही त्यांनी केली. तिकडे चौकशीच्या नावाखाली आरोग्य संचालकांना सुट्टीवर धाडले आहे मात्र या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना घरी बसवले पाहिजे. दुखणे कुठे आणि कारवाई कुठे हे सगळेच हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. 

कळवा रुग्णालयांच्या डीनला कारभार झेपत नसल्याचे दिसत असून त्यांच्या जागी नवीन डींची नियुक्ती करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.  या संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी देखील आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिका आणि हॉस्पिटल यांच्या संगणमतानेच या ठिकाणी गैरकारभार सुरू असल्याचे दिसत आहे त्यामुळे हे हॉस्पिटल शासनाकडे सुपूर्द करावे असे देखील ते म्हणाले.