शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंबरनाथमध्ये काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली

By पंकज पाटील | Updated: April 15, 2023 17:47 IST

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

अंबरनाथ: बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी मुख्य जलवाहिनी आज पहाटे काटई नाक्याजवळ फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची मोठी नासाडी झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान काटई नाका येथील हेदूटणे गावाजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. पाण्याला एवढा प्रवाह होता की वीस फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दिवसभर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी दिवसभरासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

बारवी धरणातून ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २ मोठ्या जलवाहिन्या पाईपलाईन रोडने शीळफाट्याकडे गेल्या आहेत. ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत अक्षरशः हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. सध्या दिवसभरासाठी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ