शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अंबरनाथमध्ये काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली

By पंकज पाटील | Updated: April 15, 2023 17:47 IST

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

अंबरनाथ: बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी मुख्य जलवाहिनी आज पहाटे काटई नाक्याजवळ फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची मोठी नासाडी झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान काटई नाका येथील हेदूटणे गावाजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. पाण्याला एवढा प्रवाह होता की वीस फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दिवसभर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी दिवसभरासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

बारवी धरणातून ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २ मोठ्या जलवाहिन्या पाईपलाईन रोडने शीळफाट्याकडे गेल्या आहेत. ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत अक्षरशः हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. सध्या दिवसभरासाठी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ