शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अंबरनाथमध्ये काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली

By पंकज पाटील | Updated: April 15, 2023 17:47 IST

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

अंबरनाथ: बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी मुख्य जलवाहिनी आज पहाटे काटई नाक्याजवळ फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची मोठी नासाडी झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान काटई नाका येथील हेदूटणे गावाजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. पाण्याला एवढा प्रवाह होता की वीस फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दिवसभर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी दिवसभरासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

बारवी धरणातून ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २ मोठ्या जलवाहिन्या पाईपलाईन रोडने शीळफाट्याकडे गेल्या आहेत. ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत अक्षरशः हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. सध्या दिवसभरासाठी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ