शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्वच्छतागृहे सुधारा

By admin | Updated: February 20, 2017 05:46 IST

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. पालिकेच्या या धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. उघड्यावर बसणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईची सूचना केली आहे. गरीब नागरिकांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे आणि ज्या स्वच्छतागृहात पाणीच नाही, त्या ठिकाणी नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असतील, तर त्याला केवळ पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी पालिकेने नव्याने स्वच्छतागृह बांधले. अनेक नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून दिली. मात्र, असे असतानाही काही भागांतील स्वच्छतागृहांची दुरुस्तीच झालेली नाही. पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे नागरिकांना शक्य होत नाही. ज्या भागात एकमेव स्वच्छतागृह आहे आणि तेही सुस्थितीत नसेल, तर नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर बसण्याची वेळ येते. नागरिकांची ही समस्या न सोडवता थेट उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यात जे नागरिक पकडले गेले, ते अत्यंत गरीब घरातील असून १०० ते २०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. या नागरिकांना थेट पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. १०० रुपये दंड आकारला. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, अशांना किमान पोलिसांच्या स्वाधीन करू नका, अशी सूचना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मांडली. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी या नागरिकांवर कारवाईची भीतीच निर्माण करायची असेल, तर वेळेवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच करा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घरच्यांनाही कल्पना दिली जात नाही. अशा परिस्थितीत कुटुंबामध्ये धास्ती निर्माण होते. जे उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे यावेळी सभागृहात स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)कामे पूर्ण न करताच बिलेच्दरम्यान, या विषयावर पालिका सभेत चर्चा सुरू असताना शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम केल्यावरही अनेक ठिकाणी ते काम पूर्ण न करताच बिले देण्यात आली, असा आरोपही करण्यात आला. च्अनेक स्वच्छतागृहांत रात्रीच्यावेळी दिवा, पाणी नसते. स्वच्छता, दरवाजेही नसतात. दरवाजांना कडी नसणे, अशी अवस्था आहे. यावरही पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चर्चेत नगरसेवक उमेश पाटील, विलास जोशी, वृषाली पाटील, उमर इंजिनीअर, निखिल वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी सहभाग घेतला.