शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

आधी स्वच्छतागृहे सुधारा

By admin | Updated: February 20, 2017 05:46 IST

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. पालिकेच्या या धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. उघड्यावर बसणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईची सूचना केली आहे. गरीब नागरिकांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे आणि ज्या स्वच्छतागृहात पाणीच नाही, त्या ठिकाणी नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असतील, तर त्याला केवळ पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी पालिकेने नव्याने स्वच्छतागृह बांधले. अनेक नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून दिली. मात्र, असे असतानाही काही भागांतील स्वच्छतागृहांची दुरुस्तीच झालेली नाही. पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे नागरिकांना शक्य होत नाही. ज्या भागात एकमेव स्वच्छतागृह आहे आणि तेही सुस्थितीत नसेल, तर नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर बसण्याची वेळ येते. नागरिकांची ही समस्या न सोडवता थेट उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यात जे नागरिक पकडले गेले, ते अत्यंत गरीब घरातील असून १०० ते २०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. या नागरिकांना थेट पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. १०० रुपये दंड आकारला. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, अशांना किमान पोलिसांच्या स्वाधीन करू नका, अशी सूचना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मांडली. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी या नागरिकांवर कारवाईची भीतीच निर्माण करायची असेल, तर वेळेवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच करा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घरच्यांनाही कल्पना दिली जात नाही. अशा परिस्थितीत कुटुंबामध्ये धास्ती निर्माण होते. जे उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे यावेळी सभागृहात स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)कामे पूर्ण न करताच बिलेच्दरम्यान, या विषयावर पालिका सभेत चर्चा सुरू असताना शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम केल्यावरही अनेक ठिकाणी ते काम पूर्ण न करताच बिले देण्यात आली, असा आरोपही करण्यात आला. च्अनेक स्वच्छतागृहांत रात्रीच्यावेळी दिवा, पाणी नसते. स्वच्छता, दरवाजेही नसतात. दरवाजांना कडी नसणे, अशी अवस्था आहे. यावरही पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चर्चेत नगरसेवक उमेश पाटील, विलास जोशी, वृषाली पाटील, उमर इंजिनीअर, निखिल वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी सहभाग घेतला.