शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला आहे.

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा फाटला. या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या सरकारी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, महावितरण यांच्या युटीलीटी वाहिन्या गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या वाहिन्या एका बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले असून त्यात वाहनचालक पडू नयेत यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असून यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान फलक किंवा रेडियम लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या चुकीमुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे. तसेच फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.