शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला आहे.

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा फाटला. या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या सरकारी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, महावितरण यांच्या युटीलीटी वाहिन्या गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या वाहिन्या एका बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले असून त्यात वाहनचालक पडू नयेत यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असून यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान फलक किंवा रेडियम लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या चुकीमुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे. तसेच फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.