शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला आहे.

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा फाटला. या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या सरकारी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, महावितरण यांच्या युटीलीटी वाहिन्या गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या वाहिन्या एका बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले असून त्यात वाहनचालक पडू नयेत यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असून यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान फलक किंवा रेडियम लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या चुकीमुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे. तसेच फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.