शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला आहे.

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा फाटला. या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या सरकारी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, महावितरण यांच्या युटीलीटी वाहिन्या गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या वाहिन्या एका बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले असून त्यात वाहनचालक पडू नयेत यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असून यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान फलक किंवा रेडियम लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या चुकीमुळे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे. तसेच फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.