शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेला उमगले कांदळवनाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:44 IST

संवर्धनाविषयी दिली माहिती : लागवडीसाठी एक कोटींचा प्रस्ताव

मीरा रोड : एरव्ही, कांदळवनाचा ºहास करण्यात आघाडीवर असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकारी, ठेकेदारांवर अनेक गुन्हे दाखल असतानाच आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात कांदळवनाच्या अनन्यसाधारण महत्त्वाचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. कांदळवनाची तीव्र गरज आणि त्याच्या संरक्षण व संवर्धनाचं महत्त्व व्यक्त करतानाच यंदाच्या वर्षात महापालिका कांदळवनलागवडीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. २०११ साली शहरातील २०.७ चौकिमी क्षेत्र हे कांदळवनाखाली होते आणि कांदळवनाच्या नऊ जाती आढळून आल्याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले आहे.

मीरा-भाईंदर शहरांच्या उत्तर दिशेला वसई खाडी, तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. पश्चिमेला समुद्र, तर पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. खाड्या आणि त्यांच्या उपखाड्यांच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दाट कांदळवन आहे. या दाट कांदळवनात सोनेरी कोल्ह्यासह अनेक प्राणी, पक्षी, जलचर-मासे यांचे अस्तित्व आहे. जलप्रदूषणासह हवेतील कार्बन शोषण्याची या कांदळवनाच्या झाडांची क्षमता कमालीची आहे. कांदळवनाची तोड व त्यातील भराव-बांधकामे हे पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीचे प्रमुख कारण आहे. देशाच्या घटनेत नैसर्गिक पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी नेमून दिली आहे. याशिवाय वन, सीआरझेड कायद्यांसह शासन व न्यायालयाच्या आदेशांमध्ये सातत्याने कांदळवन संरक्षित करण्यात आले आहे. परंतु, मीरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनाच्या होणाºया ºहासाला महापालिका व लोकप्रतिनिधी कारणीभूत ठरले आहेत. महापालिका अधिकारी व ठेकेदारांवर पर्यावरण ºहासाचे अनेक गुन्हे दाखल असून अद्याप अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. त्यातच, पालिकेकडून एमसीझेडएमए, न्यायालय, शासन आदींची दिशाभूल करणारी माहिती देऊन परवानग्या मिळवण्याचे प्रकारदेखील समोर आलेले आहेत. मात्र, आयुक्त बालाजी खतगावकर यांनी कांदळवनाबाबत महासभेत दिलेल्या प्रस्तावात कांदळवनाचे अनन्यसाधारण महत्त्व व त्याची नितांत आवश्यकता नमूद करून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

आयुक्तांनी कांदळवनलागवडीसाठी एक कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. कांदळवनाच्या झाडांची माहिती व वैशिष्ट्ये मांडत जमीन आणि समुद्रातील बफर झोनचे तटरक्षकाचे काम ते करते. दाट कांदळवनामुळे हिरवी भिंत निर्माण होते. जागतिक तापमानवाढीमुळे होणाºया नैसर्गिक आपत्तीपासून ते संरक्षणाचे काम करते. वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण-संवर्धन करते. मासे, खेकडे, कोळंबी आदी कांदळवनात अंडी टाकतात. जैवविविधतेमध्ये वाढ होऊन संपूर्ण जीवनसाखळी यात आकाराला येते, असे आयुक्तांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबनचा हवाला देत मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात कांदळवनाची लागवड करून देखभाल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार प्रदूषणमुक्त आणि आरोग्यपूर्ण जीवन जगणे, हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचे नमूद करत आयुक्तांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाबाबत उच्च न्यायालयासह शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचा संदर्भसुद्धा आवर्जून दिला आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का बसला आहे.

उशिराने का होईना, महापालिकेला कांदळवनाचे महत्त्व समजले, याबद्दल आनंदच आहे. पण, निव्वळ दिखावा न करता महापालिकेने आतातरी शहर व नागरिकांच्या हितासाठी नैसर्गिक कांदळवनाचे काटेकोर संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार, बिल्डर व सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये कांदळवनाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे. धार्मिक स्थळे, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.रोहित सुवर्णा (माजी नगरसेवक)